बंद

    प्रसिद्धीपत्रक

    द्वारे फिल्टर:
    09.08.2026: ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे हाती राष्ट्रीय ध्वज घेऊन राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्यगीत गायले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.  दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात साजरा केल्या जात असलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानाचा भाग म्हणून तसेच 'वंदे मातरम'  या गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकभवनातील दरबार हॉल, जल विहार यांसह इतर ऐतिहासिक महत्वाच्या इमारतींवर राष्ट्रध्वज लावण्यात आला.

    09.08.2026: लोक भवन येथे हर घर तिरंगा

    लोक भवन येथे हर घर तिरंगा ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी…

    तपशील पहा
    09.08.2026: कोणतीही गोष्ट जशी आहे तशी न स्वीकारता प्रश्न विचारणे हा पाश्चात्य विचार नसून तो अस्सल भारतीय विचार असून अर्जुनाने भगवान कृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर 'ग्रंथांचा ग्रंथ' असलेली भगवत गीता निर्माण झाली नसती असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.   जेन-झी व जेन-अल्फा या विद्यार्थी व युवकांच्या मुंबईत सुरु असलेल्या ४ दिवसांच्या 'आयमीन' चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.  परिषदेचे आयोजन इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स (IIMUN) संस्थेने केले.  या परिषदेत देशाच्या १०० शहरांतील तसेच पाच इतर देशांमधील २,१०० युवक सहभागी झाले. आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी आपल्या प्रास्ताविकात युवकांची परिषद गेल्या १५ वर्षांपासून काम करीत असल्याचे सांगितले. आज जेन झी व जेन अल्फा यांच्या विचारांना लोक गांभीर्याने ऐकत आहेत. देश आणि जग कोणत्या दिशेने जायचे हे या पिढ्या ठरवतील असे शाह यांनी सांगितले.  परिषदेचे मार्गदर्शक अभिषेक धवन, अंजनी रायपत तसेच स्तुती तक देखील यावेळी उपस्थित होते.

    09.08.2026: राज्यपालांचा जेन झी, जेन अल्फाशी संवाद

    राज्यपालांचा जेन झी, जेन अल्फाशी संवाद उपनिषदातील ‘नेति नेति’ संकल्पना चौकस बुद्धीला चालना देणारी: राज्यपाल…

    तपशील पहा
    08.08.2026: श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनाचे औचित्य साधून आयोजित 'श्री गुरू तेग बहादूर जी यांचा वारसा' या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील पंजाब हेरिटेज भवन येथे संपन्न झाले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, साहित्य अकादमी नवी दिल्ली आणि पंजाबी कल्चरल अँड वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा व्हिडीओ संदेश दाखवण्यात आला.  कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई महानगर पालिकेच्या महापौर सुजाता पाटील, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्षा कुमुद शर्मा, हरियाणा साहित्य आणि सांस्कृतिक अकादमीचे अध्यक्ष कुलदीप चंद्र अग्निहोत्री, साहित्य अकादमीचे सचिव वरुण गुलाटी, , प्रशासक तख्तश्री अबचल नगर, हुजूर साहिब विजय सतबीर सिंह, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच साहित्यिक, विद्वान आणि शीख समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    08.08.2026: श्री गुरू तेग बहादूर जी यांचे सर्वोच्च बलिदान मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा जिवंत दीपस्तंभ -राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    श्री गुरू तेग बहादूर जी यांचे सर्वोच्च बलिदान मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा जिवंत दीपस्तंभ…

    तपशील पहा
    07.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक दिलीप संघवी यांना कॉर्पोरेट उत्कृष्टतेसाठीचा ‘आयएए बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (आयएए) इंडिया चॅप्टरतर्फे आयोजित १३ व्या आयएए लीडरशिप अवॉर्ड्स सोहळ्यात राज्यपालांनी संघवी यांना सन्मानित केले. 
यावेळी इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (आयएए) इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष अभिषेक कर्नानी, पुरस्कार निवड मंडळाच्या अध्यक्षा तसेच कोलगेट-पामोलिव्ह इंडिया लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभा नरसिंहन, आयएए लीडरशिप अवॉर्ड्सच्या अध्यक्षा नंदिनी डायस, विविध उद्योग क्षेत्रांतील मान्यवर तसेच २०२६ सालच्या आयएए बिझनेस लीडर पुरस्कारांचे मानकरी उपस्थित होते.

    07.08.2026: जाहिरात क्षेत्राने नैतिकता आणि पारदर्शकता जपावी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    जाहिरात क्षेत्राने नैतिकता आणि पारदर्शकता जपावी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा विकसित भारताचे स्वप्न साकार…

    तपशील पहा
    07.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना आज ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ या हिंदी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत भेट देण्यात आली. डॉ. मेधा सोमय्या यांनी मूळ मराठीत लिहिलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद अमरजीत मिश्र यांनी केला आहे. सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी होत्या.  आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत भूषविलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला, असे उद्गार राज्यपालांनी याप्रसंगी काढले. सुषमा स्वराज या अमोघ वक्त्या होत्या; उत्कृष्ट संसदपटू होत्या; लढवैय्या विरोधी पक्ष नेत्या होत्या व कार्यक्षम मंत्री होत्या. आज समाजाला त्यांच्या सारख्या समकालीन आदर्शवत व्यक्तिमत्वाची (रोल मॉडेलची) गरज आहे असे राज्यपालांनी सांगितले. स्वराज यांनी केलेले संस्कृत मधील एक भाषण इतके अस्खलित आणि विद्वत्ता प्रचुर होते की संस्कृतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते ऐकावे. आपण विद्यापीठांना सुषमा स्वराज यांचे ते भाषण ऐकण्याची शिफारस करु असेही त्यांनी सांगितले.  उत्तर पूर्वेकडील राज्यात आपले पक्ष संघटन कमजोर होते. सुषमाजी मात्र कार्यकर्त्यांच्या निमंत्रणावरून आवर्जून उत्तर पूर्वेकडील राज्यांना भेट द्यायच्या. भाषणाला जाण्यापूर्वी त्या स्थानिक भाषेतील शब्द, वाक्य समजून घ्यायच्या व भाषणात वापरायच्या. त्यामुळे त्या उत्तर पूर्वेत अतिशय लोकप्रिय होत्या असे राज्यपालांनी सांगितले.  यावेळी लेखिका डॉ मेधा सोमैया व अनुवादक अमरजीत मिश्र यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ किरीट सोमय्या, नगरसेवक डॉ नील सोमय्या, मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

    07.08.2026: सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा अमरजीत मिश्र यांच्या ‘अग्निशिखा…

    तपशील पहा
    06.08.2026: 'अनंत कन्हेरे : द बुलेट दॅट अवोक भारत' या क्रांतिकारक अनंत कन्हेरे यांच्या जीवनावरील इंग्रजी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन मुंबई येथे संपन्न झाले. अनंत कन्हेरे यांच्यावरील प्रा. डॉ. म. बा. कुलकर्णी यांच्या मूळ मराठी पुस्तकाचा सदर पुस्तक अनुवाद आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सत्याग्रह चळवळीसोबतच क्रांतिकारी राष्ट्रवादाची एक प्रभावी विचारधारा होती. या क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अपेक्षित प्रमाणात गौरविले गेलेले नाही. अश्या अज्ञात क्रांतिकारकांचे जीवन, कार्य आणि त्याग यांचे दस्तऐवजीकरण स्वतंत्र लघु पुस्तकांच्या मालिकेद्वारे व्हावे, जेणेकरून नव्या पिढीला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे समग्र आकलन होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.  क्रांतिकारकांवरील पुस्तके मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित व्हावी असेही राज्यपालांनी सांगितले. भाषांतर हे भाषा आणि प्रदेश यांमधील दुवा म्हणून कार्य करते. त्यामुळे या राष्ट्रनायकांच्या प्रेरणादायी कथा देशभरातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि सर्वांना प्रेरणा देतील, असे त्यांनी सांगितले. प्रकाशन सोहळ्याला भारतीय विचार साधना संस्थेचे अध्यक्ष डॉ गिरीश आफळे, जयेश क्षेमकल्याणी, अनुवादक चिन्मय खेडेकर, रवींद्र संघवी तसेच इतर  निमंत्रित उपस्थित होते.

    06.08.2026: राज्यपालांच्या हस्ते अनंत कन्हेरे यांचेवरील पुस्तकाचे प्रकाशन

    राज्यपालांच्या हस्ते अनंत कन्हेरे यांचेवरील पुस्तकाचे प्रकाशन ‘अनंत कान्हेरे : द बुलेट दॅट अवोक भारत’…

    तपशील पहा
    05.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लडाख येथील महायान बुद्ध परंपरेतील ८ वे अवतारी लामा  पल्गा रिम्पोछे  तसेच ज्येष्ठ विचारवंत इंद्रेश कुमार यांना  यांना शांतता व राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या कार्याबद्दल   मुंबई येथे 'राष्ट्रीय एकात्मिक समरसता' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध धर्मांचे प्रतिनिधी आणि बौद्ध भिक्षु संघाचे भिक्षु तसेच न‍िमंत्र‍ित  उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते भिक्षूंना प्रातिनिधिक रूपात चीवरदान करण्यात आले.

    05.08.2026: राज्यपालांच्या हस्ते लडाख येथील युवा धर्मगुरू पल्गा रिम्पोछे, इंद्रेश कुमार राष्ट्रीय एकात्मिक समरसता पुरस्काराने सन्मानित

    राज्यपालांच्या हस्ते लडाख येथील युवा धर्मगुरू पल्गा रिम्पोछे, इंद्रेश कुमार राष्ट्रीय एकात्मिक समरसता पुरस्काराने सन्मानित…

    तपशील पहा
    05.08.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह भारताच्या पहिल्या राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांचा लोकभवन येथे भव्य सत्कार केला. दृष्टिबाधित महिला टी-२० विश्वचषक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या संघाच्या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘देख ले! इंडिया’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर ऋतु तावडे, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू तसेच विविध शाळा व महाविद्यालयांतील दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    05.08.2026: देख ले ! इंडिया: टाळ्यांच्या कडकडाटात विश्वविजेत्या अंध महिला क्रिकेटपटूंचा लोकभवन येथे सत्कार

    देख ले ! इंडिया: टाळ्यांच्या कडकडाटात विश्वविजेत्या अंध महिला क्रिकेटपटूंचा लोकभवन येथे सत्कार अंध महिलांच्या…

    तपशील पहा
    04.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवनातील श्रीगुंडी यात्रोत्सवाला सुरुवात   राज्यपाल ज‍िष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या पूजेने लोकभवन मुंबई परिसरातील पारंपरिक श्रीगुंडी देवी यात्रेला  सुरुवात झाली. राज्यपालांनी देवी मंदीरामध्ये जाऊन देवीमातेची पूजा व आरती केली. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी,  प्रभू राम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले.   यात्रेनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर व इतर परिसरातील अनेक कोळी बांधवांनी देवीचे दर्शन घेतले.   राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले.  लोकभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी लोकभवन परिसरातील ही एकदिवसीय यात्रा भरते.  पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

    04.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवनातील श्रीगुंडी यात्रोत्सवाला सुरुवात

    राज्यपालांच्या उपस्थितीत लोकभवनातील श्रीगुंडी यात्रोत्सवाला सुरुवात राज्यपाल ज‍िष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या पूजेने लोकभवन…

    तपशील पहा

    04.08.2026: उत्तर पूर्व राज्यातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणले: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली

    उत्तर पूर्व राज्यातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणले: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची…

    तपशील पहा
    03.08.2026:   गिरगाव मुंबई येथील आर्यन हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपण लिहिलेल्या तीन पुस्तकांचा संच भेट दिला.  लेखकांचे अभिनंदन  करताना राज्यपाल म्हणाले की, जेव्हा लेखक पुस्तक लिहितो, तेव्हा तो आपल्या विचारांना पंख देतो व जगाच्या ज्ञानात भर घालतो. पुस्तक कधीही मरत नाही. लेखक समाजाला काहीतरी परत देत असतो.  एकमेकांना भेटताना पुष्पगुच्छ न देता पुस्तके दिली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.   महाराष्ट्र ही संत आणि वीरांची भूमी आहे. राज्यात लेखकांची देखील एक मोठी परंपरा आहे. आज आपण ई-पुस्तकांच्या युगात वावरत असलो तरी देखील पारंपरिक पुस्तक वाचनाचे महत्व वेगळे आहे व पुस्तक वाचनाचा आनंद कायम आहे. नव्या युगात पारंपरिक पुस्तक वाचनाचा आनंद हरवू नये, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.नामजोशी यांनी राज्यपालांना 'मोगरा फुलाला दारी' हा कथासंग्रह, 'स्मृतिगंध' हे समाजातील गणमान्य व्यक्तींशी केलेल्या पत्रव्यवहाराचे संकलन असलेले पुस्तक तसेच 'भीमा' ही आदिवासी मुलीच्या कर्तृत्वाची व तिच्या आईच्या त्यागाची कहाणी असलेली कादंबरी भेट दिली. यावेळी नामजोशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    03.08.2026: आर्यनचे माजी मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांचेकडून राज्यपालांना पुस्तक भेट

    आर्यनचे माजी मुख्याध्यापक नीलकंठ नामजोशी यांचेकडून राज्यपालांना पुस्तक भेट पारंपरिक पद्धतीने पुस्तक वाचनाचा आनंद हरवू…

    तपशील पहा
    Maharashtra Governor pays tributes to Kranti Sinh Nana Patil

    03.08.2026 राज्यपालांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

    राज्यपालांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव…

    तपशील पहा