बंद

    09.08.2026: राज्यपालांचा जेन झी, जेन अल्फाशी संवाद

    प्रकाशित तारीख : August 9, 2026
    09.08.2026: कोणतीही गोष्ट जशी आहे तशी न स्वीकारता प्रश्न विचारणे हा पाश्चात्य विचार नसून तो अस्सल भारतीय विचार असून अर्जुनाने भगवान कृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर 'ग्रंथांचा ग्रंथ' असलेली भगवत गीता निर्माण झाली नसती असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.   जेन-झी व जेन-अल्फा या विद्यार्थी व युवकांच्या मुंबईत सुरु असलेल्या ४ दिवसांच्या 'आयमीन' चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.  परिषदेचे आयोजन इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स (IIMUN) संस्थेने केले.  या परिषदेत देशाच्या १०० शहरांतील तसेच पाच इतर देशांमधील २,१०० युवक सहभागी झाले. आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी आपल्या प्रास्ताविकात युवकांची परिषद गेल्या १५ वर्षांपासून काम करीत असल्याचे सांगितले. आज जेन झी व जेन अल्फा यांच्या विचारांना लोक गांभीर्याने ऐकत आहेत. देश आणि जग कोणत्या दिशेने जायचे हे या पिढ्या ठरवतील असे शाह यांनी सांगितले.  परिषदेचे मार्गदर्शक अभिषेक धवन, अंजनी रायपत तसेच स्तुती तक देखील यावेळी उपस्थित होते.

    राज्यपालांचा जेन झी, जेन अल्फाशी संवाद

    उपनिषदातील ‘नेति नेति’ संकल्पना चौकस बुद्धीला चालना देणारी: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    कोणतीही गोष्ट जशी आहे तशी न स्वीकारता प्रश्न विचारणे हा पाश्चात्य विचार नसून तो अस्सल भारतीय विचार असून अर्जुनाने भगवान कृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर ‘ग्रंथांचा ग्रंथ’ असलेली भगवत गीता निर्माण झाली नसती असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.

    जेन-झी व जेन-अल्फा या विद्यार्थी व युवकांच्या मुंबईत सुरु असलेल्या ४ दिवसांच्या ‘आयमीन’ चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते. परिषदेचे आयोजन इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स (IIMUN) संस्थेने केले. या परिषदेत देशाच्या १०० शहरांतील तसेच पाच इतर देशांमधील २,१०० युवक सहभागी झाले.

    भारतीय पुराणात अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा व मंदोदरी यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या काळातील त्या बंडखोर होत्या. त्यांनी सरधोपट मार्ग निवडला नाही तर शक्य तेथे प्रस्थापितांना सवाल केला. सावित्रीने तर मृत्यूची देवता यमराजाला सवाल केला असे राज्यपालांनी सांगितले.

    उपनिषदांमधील ‘नेति नेति’ या उद्गारामुळे सत्यान्वेषण नवनव्या मार्गाने झाले. ही संकल्पना प्रश्न विचारणाऱ्या चौकस बुद्धीला चालना देणारी आहे असे राज्यपालांनी सांगितले.

    ठराविक नियमांच्या चौकटीतच स्वातंत्र्याचा खरा उपभोग घेता येतो असे सांगताना एखाद्या रागातील स्वरांची चौकट पाळली तर त्या चौकटीत वेगवेगळे गायक नवनवीन पद्धतीने गाऊ शकतात, असे राज्यपालांनी सांगितले. गाण्याचे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी ठराविक रागाची चौकट मात्र कसोशीने पाळली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

    आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी आपल्या प्रास्ताविकात युवकांची परिषद गेल्या १५ वर्षांपासून काम करीत असल्याचे सांगितले. आज जेन झी व जेन अल्फा यांच्या विचारांना लोक गांभीर्याने ऐकत आहेत. देश आणि जग कोणत्या दिशेने जायचे हे या पिढ्या ठरवतील असे शाह यांनी सांगितले.

    परिषदेचे मार्गदर्शक अभिषेक धवन, अंजनी रायपत तसेच स्तुती तक देखील यावेळी उपस्थित होते.

    **

    *उपनिषदों की ‘नेति नेति’ अवधारणा जिज्ञासु और प्रश्नाकुल बुद्धि को प्रेरित करती है : राज्यपाल जिष्णु देव वर्मा*
    *राज्यपाल ने जेन-ज़ी और जेन-अल्फा के युवाओं से किया संवाद*

    मुंबई, 9 अगस्त : किसी भी बात को केवल इसलिए स्वीकार न कर लेना कि वह जैसी बताई जा रही है वैसी ही है, बल्कि उसके बारे में प्रश्न करना और सत्य को जानने का प्रयास करना—यह पश्चिमी विचार नहीं, बल्कि प्रामाणिक भारतीय चिंतन की परंपरा है। यदि अर्जुन ने भगवान श्रीकृष्ण से प्रश्न ही न किए होते, तो ‘ग्रंथों का ग्रंथ’ कही जाने वाली भगवद्गीता का जन्म ही नहीं होता, ऐसा प्रतिपादन महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज यहाँ किया।

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुंबई में जेन-ज़ी और जेन-अल्फा के विद्यार्थियों एवं युवाओं के लिए आयोजित चार दिवसीय ‘IIMUN Championship Conference’ के समापन सत्र को संबोधित कर रहे थे। इस सम्मेलन का आयोजन International Movement to Unite Nations (IIMUN) द्वारा किया गया। सम्मेलन में देश के 100 शहरों तथा पाँच अन्य देशों के लगभग 2,100 युवाओं ने भाग लिया।

    राज्यपाल ने भारतीय चिंतन परंपरा में प्रश्न पूछने की महत्ता को रेखांकित करते हुए कहा कि भारतीय संस्कृति ने कभी भी जिज्ञासा और स्वतंत्र चिंतन को दबाया नहीं। उन्होंने कहा कि भारतीय पुराणों में अहल्या, द्रौपदी, सीता, तारा और मंदोदरी जैसी महिलाओं का सम्मानपूर्वक स्मरण किया जाता है। अपने-अपने समय और परिस्थितियों में उन्होंने रूढ़ और एकरूप मार्ग का अनुसरण करने के बजाय जहाँ आवश्यक हुआ, वहाँ स्थापित मान्यताओं पर प्रश्न उठाए।

    उन्होंने कहा कि सावित्री ने तो मृत्यु के देवता यमराज से भी प्रश्न और संवाद किया। इसी प्रकार उपनिषदों में प्रयुक्त ‘नेति नेति’—अर्थात् ‘यह नहीं, यह भी नहीं’— की अवधारणा सत्य की खोज के लिए मनुष्य को निरंतर प्रश्न करने और नए मार्ग तलाशने के लिए प्रेरित करती है। यह अवधारणा जिज्ञासु, विवेकशील और प्रश्नाकुल बुद्धि को विकसित करने वाली भारतीय ज्ञान परंपरा की अद्भुत देन है।

    राज्यपाल ने कहा कि स्वतंत्रता और अनुशासन एक-दूसरे के विरोधी नहीं, बल्कि परस्पर पूरक हैं। उन्होंने संगीत का उदाहरण देते हुए कहा कि किसी राग के निश्चित स्वर-विन्यास और मर्यादाओं का पालन करते हुए अलग-अलग गायक उसी राग को अपनी विशिष्ट शैली और रचनात्मकता के साथ प्रस्तुत कर सकते हैं। अर्थात्, स्वतंत्र अभिव्यक्ति का वास्तविक आनंद तभी लिया जा सकता है जब उसकी मूल मर्यादाओं और अनुशासन का सम्मान किया जाए।

    युवाओं को संबोधित करते हुए राज्यपाल ने कहा कि आज की जेन-ज़ी और जेन-अल्फा केवल भविष्य के नागरिक नहीं हैं, बल्कि वे वर्तमान में ही समाज और विश्व की दिशा को प्रभावित करने वाली पीढ़ियाँ हैं। इसलिए उन्हें प्रश्न पूछने के साथ-साथ अपने प्रश्नों के उत्तर खोजने, तथ्यों की जाँच करने, विभिन्न विचारों को समझने और जिम्मेदारी के साथ अपने विचार व्यक्त करने की आदत विकसित करनी चाहिए।

    IIMUN के संस्थापक ऋषभ शाह ने अपने स्वागत भाषण में बताया कि यह युवा सम्मेलन पिछले 15 वर्षों से युवाओं को वैश्विक मुद्दों पर विचार-विमर्श और संवाद का मंच प्रदान कर रहा है। उन्होंने कहा कि आज जेन-ज़ी और जेन-अल्फा की आवाज़ और विचारों को गंभीरता से सुना जा रहा है तथा देश और विश्व किस दिशा में आगे बढ़ेंगे, इसमें इन पीढ़ियों की महत्वपूर्ण भूमिका होगी।

    इस अवसर पर सम्मेलन के मार्गदर्शक अभिषेक धवन, अंजनी रायपत तथा स्तुति तक सहित अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।

    **