बंद

    रूपरेखा-माननीय राज्यपाल

    Shri Ramesh Bais

    महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांचा अल्प परिचय (मराठी)

    दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतलेले श्री रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.

    संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मा. रमेश बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.

    दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले श्री.रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.

    सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

    सन १९८९ साली श्री बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे.

    सन १९९८ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात श्री रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

    सन १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.

    सन २००३ साली श्री रमेश बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

    आपल्या प्रदीर्घ सांसदीय जीवनात श्री बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

    सन २००९ ते २०१४ या काळात श्री रमेश बैस भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्री बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर ) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयका संदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

    सन २०१९ साली श्री रमेश बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्विकारला.

    त्रिपुराचे राज्यपाल असताना श्री रमेश बैस यांनी बांबूच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले. झारखंडचे राज्यपाल या नात्याने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र ‘श्री सम्मेद शिखरजी’ हे पर्यटन स्थळ घोषित होण्यापासून थांबवले होते. कत्तलीसाठी महाराष्ट्रात आणलेल्या उंटांचे जीव वाचवून त्यांच्या पुनर्वसन करण्याच्या कार्यात देखील त्यांचे मोलाचे योगदान होते.

    राज्यपाल श्री रमेश बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबीरे, नेत्र तपासणी शिबीर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. श्री रमेश बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्य प्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. श्री बैस यांना काष्ठ शिल्पकलेची आवड असून त्यांनी अनेक देवी देवतांची शिल्पे तयार केली आहेत.

    महाराष्ट्राला अशा प्रकारचे विविधांगी कार्यानुभव असलेले व्यक्तिमत्त्व राज्यपाल म्हणून लाभलेले आहे..

    महाराष्ट्र के राज्यपाल श्री रमेश बैस का संक्षिप्त परिचय (हिन्दी)

    महाराष्ट्र के राज्यपाल के रूप में श्री. रमेश बैसजी ने १८ फरवरी २०२३ को राज भवन, मुंबई में शपथ ग्रहण की है। आप तत्कालीन मध्य प्रदेश एवं वर्तमान छत्तीसगढ़ राज्य और राष्ट्रीय राजनीति के एक सुविख्यात और सम्मानित व्यक्तित्व हैं।

    संसदीय राजनीति, समाजकारण और संगठन कार्यों में पांच दशकों से अधिक के अनुभव के साथ बैसजी ने सार्वजनिक जीवन में नगरसेवक के पद से लेकर केंद्रीय राज्य मंत्री और राज्यपाल के पद तक विभिन्न जिम्मेदारियों का सफलतापूर्वक निर्वहन किया है।

    २ अगस्त १९४७ को रायपुर (छत्तीसगढ़) में जन्मे रमेश बैस की शिक्षा रायपुर में हुई।

    वर्ष १९७८ में वे पहली बार रायपुर नगर निगम में पार्षद चुने गए। वे १९८० से १९८५ तक मध्य प्रदेश विधान सभा के सदस्य रहे। इस अवधि के दौरान, उन्होंने मध्य प्रदेश विधानमंडल की बजट समिति के सदस्य और फिर पुस्तकालय समिति के सदस्य के रूप में कार्य किया। १९८२ से १९८८ तक मध्य प्रदेश भारतीय जनता पार्टी के राज्य मंत्री भी रहे। १९९१ में उन्होने मध्य प्रदेश बीज निगम के अध्यक्ष के रुप में भी कार्य किया है।

    वर्ष १९८९ में वे पहली बार रायपुर से लोकसभा के लिए चुने गए थे। इसके बाद उन्होंने छह बार यानी कुल मिलाकर सात बार लोकसभा के लिए चुने जाने का रिकॉर्ड बनाया।

    वर्ष १९९८ में, श्री रमेश बैस को प्रधान मंत्री अटल बिहारी वाजपेयी के मंत्रिमंडल में इस्पात और खान मंत्रालय में राज्य मंत्री के रूप में नियुक्त किया गया था।

    १९९९ से २००४ की अवधि के दौरान, उन्होंने पहले रसायन और उर्वरक राज्य मंत्री और फिर सूचना और प्रसारण राज्य मंत्री के रूप में कार्य किया।

    वर्ष २००३ में, श्री रमेश बैस को केंद्रीय खान मंत्रालय में राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) के रूप में नियुक्त किया गया और उसके बाद कुछ समय के लिए वे केंद्रीय पर्यावरण और वन मंत्रालय में राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) रहे।

    अपने लंबे संसदीय कैरियर के दौरान, श्री बैस ने पेट्रोलियम और प्राकृतिक गैस पर संसदीय समिति, लोक लेखा समिति, विद्युत मंत्रालय की सलाहकार समिति, कोयला और खान मंत्रालय की हिंदी सलाहकार समिति, नियम समिति आदि के सदस्य के रूप में अच्छा कार्य किया है।

    २००९ से २०१४ तक, श्री रमेश बैस लोकसभा में भारतीय जनता पार्टी के मुख्य सचेतक रहे। वह २०१४ से २०१९ तक १६ वीं लोकसभा के सदस्य भी रहे। इस अवधि के दौरान वे सामाजिक न्याय और अधिकारिता पर संसदीय स्थायी समिति के अध्यक्ष थे। श्री बैस ने विकलांग व्यक्तियों के साथ-साथ ट्रांसजेंडर व्यक्तियों के लिए अधिकार और सुरक्षा विधेयक के संबंध में व्यापक शोध और अध्ययन किया है।

    वर्ष २०१९ में श्री रमेश बैस को राज्यपाल के पद पर नियुक्त किया गया। वह २९ जुलाई २०१९ से १३ जुलाई २०२१ तक त्रिपुरा के राज्यपाल रहे। फिर उन्हें १४ जुलाई २०२१ को झारखंड के राज्यपाल के पद पर स्थानांतरित कर दिया गया। १८ फरवरी, २०२३ को श्री रमेश बैस को महाराष्ट्र के राज्यपाल के रूप में नियुक्त किया गया।

    त्रिपुरा राज्यपाल के अपने कार्यकाल में उन्होंने बांस उत्पादों को प्रोत्साहित किया था। झारखंड के राज्यपाल के रूप में श्री रमेश बैस ने पवित्र जैन तीर्थस्थल ‘श्री सम्मेद शिखरजी’ को पर्यटन स्थल घोषित होने से रोका था। महाराष्ट्र में आने के बाद, उन्होंने वध के लिए महाराष्ट्र लाए गए ऊंटों के बचाव और पुनर्वास में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई।

    श्री बैस जी को समाज सेवा का विशेष शौक है और इन्होंने ग्रामीण क्षेत्रों में कई स्वास्थ्य शिविर, नेत्र जांच- शिविर और खेल प्रतियोगिताओं का आयोजन किया है। श्री रमेश बैस पहली बार छत्तीसगढ़ तीरंदाजी ओलम्पिक संघ के अध्यक्ष रहे।

    राज्यपाल श्री रमेश बैस जी बचपन से ही चित्रकला, वूडन कार्विंग और बागवानी में रुचि रखते है।

    महाराष्ट्र को राज्यपाल के रूप में ऐसा बहुमुखी व्यक्तित्व प्राप्त हुआ है।
    *****