बंद

    24.04.2026 : कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन व्हावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    प्रकाशित तारीख : April 25, 2026
    कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन व्हावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन व्हावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    नामशेष होत असलेल्या कलांचे जतन करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची राज्यपालांची सूचना

    आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग विविध क्षेत्रात मोठी भूमिका बजावणार आहे. त्याचे लाभ जसे अनेक आहेत तसेच त्यातून अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला अधिक संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन झाले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याप्ती वाढवून समाजाच्या शेवटच्या घटकातील लोकांना घेऊन समावेशी विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.

    नाविन्यपूर्ण कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी मुंबई येथील ऍटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीने सुरु केलेल्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन’चे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २४) संस्थेच्या बीकेसी येथील शैक्षणिक संकुलात झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी ओ पी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीने ‘सिरील श्रॉफ सेन्टर ऑफ एआय, लॉ अँड रेग्युलेशन’ यांच्या सहकार्याने आयोजित ‘गव्हर्निंग एआय : कायदा, तंत्रज्ञान व समाज’ या विषयावरील चर्चासत्राचे देखील उदघाटन राज्यपालांनी केले.

    तंत्रज्ञान उपलब्ध असणे, परंतु ठोस उद्दिष्ट समोर नसणे; किंवा विज्ञान उपलब्ध असणे, परंतु त्याला मानवी मूल्यांची जोड नसणे धोक्याचे असते, असे सांगून कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करताना दया, अनुकंपा व सहानुभूतीचा त्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. या दृष्टीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दुर्बल घटकांबद्दल अनुकंपा सहानुभूती बाणवली पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

    पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान’ या घोषणेला ‘जय किसान’ची घोषणेची जोड दिली होती. त्यानंतर पंतप्रधान वाजपेयी यांनी आपल्या काळात त्याला ‘जय विज्ञान’ची जोड दिली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या घोषणेला ‘जय अनुसंधान’ची जोड दिली असे सांगून सध्याचे युग हे विज्ञान व नवोन्मेषाचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    ‘विकसित भारत’ संज्ञेचा अर्थ आर्थिक दृष्ट्या संपन्न भारत इतका मर्यादित नाही असे सांगून ‘विकसित भारत’ म्हणजे ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामय’ हा आहे व त्याकरिता प्रत्येक व्यक्तीचा विकास होणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले.

    नामशेष होत असलेल्या कलांचे जतन व्हावे

    आधुनिकीकरण तसेच मोठ्या प्रमाणावर यंत्रनिर्मित वस्तूंचा वापर वाढल्यामुळे आज जगभरातील हजारो पारंपरिक कला प्रकार आणि हस्तकला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एक कला जरी नामशेष झाली तरी आपण आपली सांस्कृतिक ओळख गमावतो. त्यामुळे नामशेष होत असलेल्या कलांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे व त्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेतला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    एखादी दुर्मिळ कला वाचवणे म्हणजे तिला संग्रहालयात बंदिस्त करणे असे नसून तिला नवसंजीवनी देणे होय असे राज्यपालांनी सांगितले.

    या कार्यात ऍटलास कौशल्य विद्यापीठाने देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी ओ.पी. जिंदल ग्लोबल विद्यापीठातर्फे प्रकाशित एआय गव्हर्नन्स अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

    ऍटलास स्किलटेक विद्यापीठाच्या संस्थापिका डॉ इंदू शहानी यांनी प्रास्ताविक केले तर ओ.पी. जिंदल ग्लोबल विद्यापीठाचे कुलगुरु सी राज कुमार यांनी ‘गव्हर्निंग एआय’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राची भूमिका विशद केली.

    सुरुवातीला राज्यपालांनी विद्यापीठाच्या नाविन्यता केंद्राला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांचेकडून नाविन्यपूर्ण उपक्रम व प्रयोगांची माहिती घेतली.

    कार्यक्रमाला ऍटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ शहानी, कुलगुरु डॉ राजन वेळूकर, सिरील अमरचंद मंगलदास कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार सिरील श्रॉफ, अपग्रॅडचे अध्यक्ष रॉनी स्क्रूवाला, विद्यापीठाचे रजिस्ट्रार पराग अमीन, अध्यापक, निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते.

    *****

    कृत्रिम बुद्धिमत्ता को संवेदनशील बनाने पर चिंतन आवश्यक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    लुप्त होती कलाओं के संरक्षण के लिए विश्वविद्यालय आगे आएं : राज्यपाल

    आगामी समय में कृत्रिम बुद्धिमत्ता और मशीन लर्निंग विभिन्न क्षेत्रों में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाली हैं। इनके अनेक लाभ हैं, लेकिन इनके कारण कई समस्याएँ भी उत्पन्न हो सकती हैं। इसलिए कृत्रिम बुद्धिमत्ता को अधिक संवेदनशील बनाने पर गंभीर चिंतन होना आवश्यक है। कृत्रिम बुद्धिमत्ता का विस्तार इस प्रकार होना चाहिए कि समाज के अंतिम व्यक्ति तक उसका लाभ पहुँचे और समावेशी विकास सुनिश्चित हो, ऐसा प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज यहाँ किया।

    मुंबई स्थित एटलस स्किलटेक यूनिवर्सिटी द्वारा नवोन्मेषी कौशल-आधारित शिक्षा को बढ़ावा देने के लिए स्थापित ‘सेंटर फॉर इनोवेशन’ का उद्घाटन राज्यपाल के हस्ते शुक्रवार (दि. 24) को बीकेसी स्थित शैक्षणिक परिसर में किया गया। इस अवसर पर वे संबोधित कर रहे थे।

    इस अवसर पर ओ.पी. जिंदल ग्लोबल यूनिवर्सिटी के ‘सिरिल श्रॉफ सेंटर ऑफ एआई, लॉ एंड रेगुलेशन’ के सहयोग से आयोजित ‘गवर्निंग एआई : कानून, प्रौद्योगिकी और समाज’ विषयक सेमिनार का भी उद्घाटन राज्यपाल ने किया।

    राज्यपाल ने कहा कि केवल तकनीक उपलब्ध होना, परंतु स्पष्ट उद्देश्य का अभाव होना या विज्ञान का विकास होना लेकिन उसमें मानवीय मूल्यों का अभाव होना, यह खतरनाक हो सकता है। कृत्रिम बुद्धिमत्ता के नियमन में दया, करुणा और सहानुभूति का समावेश होना चाहिए। इस दिशा में स्कूल और कॉलेज के विद्यार्थियों में कमजोर वर्गों के प्रति संवेदनशीलता विकसित करने का उन्होंने आह्वान किया।

    उन्होंने कहा कि प्रधानमंत्री लालबहादुर शास्त्री ने ‘जय जवान’ के साथ ‘जय किसान’ का नारा दिया, तत्पश्चात प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी ने ‘जय विज्ञान’ जोड़ा और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इसमें ‘जय अनुसंधान’ जोड़ा। इससे स्पष्ट है कि वर्तमान युग विज्ञान और नवाचार का युग है।

    राज्यपाल ने कहा कि ‘विकसित भारत’ का अर्थ केवल आर्थिक समृद्धि नहीं है, बल्कि ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः’ की भावना का साकार होना है, जिसके लिए प्रत्येक व्यक्ति का समग्र विकास आवश्यक है।

    लुप्त होती कलाओं का संरक्षण आवश्यक

    आधुनिकीकरण और बड़े पैमाने पर मशीन निर्मित वस्तुओं के बढ़ते उपयोग के कारण विश्वभर में हजारों पारंपरिक कला और हस्तकलाएँ लुप्त होने के कगार पर हैं। एक भी कला के समाप्त होने से हमारी सांस्कृतिक पहचान को क्षति पहुँचती है। इसलिए इन कलाओं के संरक्षण और संवर्धन के लिए विश्वविद्यालयों को आगे आना चाहिए, ऐसा राज्यपाल ने कहा।

    उन्होंने कहा कि किसी दुर्लभ कला को बचाने का अर्थ उसे संग्रहालय में बंद कर देना नहीं है, बल्कि उसे नया जीवन देना है। इस दिशा में एटलस स्किलटेक यूनिवर्सिटी को भी पहल करने का उन्होंने आह्वान किया।

    इस अवसर पर राज्यपाल के हस्ते ओ.पी. जिंदल ग्लोबल यूनिवर्सिटी द्वारा प्रकाशित एआई गवर्नेंस रिपोर्ट का विमोचन भी किया गया।

    कार्यक्रम में एटलस स्किलटेक यूनिवर्सिटी की संस्थापिका डॉ. इंदु शहानी ने प्रस्तावना रखी, जबकि ओ.पी. जिंदल ग्लोबल यूनिवर्सिटी के कुलपति प्रो. सी. राज कुमार ने ‘गवर्निंग एआई’ विषय पर राष्ट्रीय सेमिनार की रूपरेखा प्रस्तुत की।

    कार्यक्रम की शुरुआत में राज्यपाल ने विश्वविद्यालय के इनोवेशन सेंटर का दौरा किया और विद्यार्थियों से संवाद करते हुए उनके नवाचारों और प्रयोगों की जानकारी ली।

    इस अवसर पर एटलस स्किलटेक यूनिवर्सिटी के कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ शहानी, कुलपति डॉ. राजन वेळूकर, सिरिल अमरचंद मंगलदास के प्रबंध साझेदार सिरिल श्रॉफ, अपग्रैड के अध्यक्ष रॉनी स्क्रूवाला, रजिस्ट्रार पराग अमीन, प्राध्यापक, आमंत्रित अतिथि और छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे।