26.05.2026:राज्यपालांच्या उपस्थितीत टीबी मुक्त मुंबई अभियानाला सुरुवात
राज्यपालांच्या उपस्थितीत टीबी मुक्त मुंबई अभियानाला सुरुवात
मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
‘टीबी मुक्त भारत अभियान’ मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई’ मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २६) सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे करण्यात आला. राज्यपालाच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवी संस्थांचा देखील सत्कार करण्यात आला.
लोकभवनच्या पुढाकाराने आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई’ मोहिमेच्या उदघाटनला मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार डॉ ज्योती गायकवाड आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर, मार्केट व गार्डन समितीचे उपाध्यक्ष भास्कर शेट्टी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉक्टर्स, आशा सेविका तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘टीबी मुक्त मुंबई’ च्या अभियानावर आधारित माहिती पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
आज बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे लोकभवनच्या पुढाकाराने ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करण्यात असून अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
मुंबईला टीबीमुक्त करण्यात आपण यशस्वी झालो, तर ते केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी उदाहरण ठरेल. त्यामुळे मुंबईची प्रतिमा अधिक चांगली होईल असे राज्यपालांनी सांगितले.
या अभियानाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, रेड क्रॉस सोसायटी, एनसीसी, ‘माय युवा भारत’चे स्वयंसेवक, स्काऊट व गाईड, स्वयंसेवी संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांना सहभागी केले जाणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
टीबीचा योग्य वेळी उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो तसेच शासनाकडून तपासणी व उपचाराच्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी देश टीबी मुक्त होणे आवश्यक असून त्या दृष्टीने ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान महत्वाचे आहे असे राज्यपालांनी नमूद केले. सरकार आणि समाजाने एकत्रित येऊन कार्य केल्यास यश हमखास लाभते असे राज्यपालांनी सांगितले.
सुरुवातीला राज्यपालांनी धारावी येथील एकनाथराव गायकवाड आरोग्य केंद्र येथे क्षयरोग अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका यांचेशी संवाद साधला तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण केले.
या कार्यक्रमात राज्यपालांनी ३० क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. राज्यपालांच्या या निर्णयाबद्दल महापौर रितू तावडे यांनी राज्यपालांना ‘निक्षय मित्र’ प्रमाण पत्र प्रदान केले.
राज्यपालांच्या हस्ते भारत पेट्रोलियम, न्यारा एनर्जी, अदाणी फाउंडेशन, मेट्रोपोलीस हेल्थ आदी संस्थांना त्यांच्या क्षयरोग अभियानातील सहभागाबद्दल प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात आले.
**
मुंबई को टीबी मुक्त बनाने के लिए जनभागीदारी आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
‘टीबी मुक्त भारत अभियान’ को मुंबई के कोने-कोने तक पहुंचाने के उद्देश्य से बृहन्मुंबई महानगर पालिका की ओर से आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान का शुभारंभ मंगलवार (26 मई) को सायन स्थित लोकमान्य तिलक हॉस्पिटल में राज्यपाल जिष्णु देव वर्मा की प्रमुख उपस्थिति में किया गया। इस अवसर पर राज्यपाल के हाथों राष्ट्रीय क्षयरोग उन्मूलन कार्यक्रम में सहभागी स्वयंसेवी संस्थाओं का भी सम्मान किया गया।
महाराष्ट्र लोकभवन के पहल पर आयोजित ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान के उद्घाटन समारोह में मुंबई की महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विधायक कॅप्टन तमिल सेल्वन , विधायक डॉ ज्योती गायकवाड, विधायक सुनील शिंदे, महानगरपालिका की सार्वजनिक स्वास्थ्य समिति के अध्यक्ष हरीश भांदिर्गे, शिक्षा समिति की अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर, मार्केट एवं गार्डन समिति के उपाध्यक्ष भास्कर शेट्टी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा, राज्यपाल के सचिव डॉ प्रशांत नारनवरे, डॉक्टर, आशा सेविकाएं तथा महानगरपालिका के अधिकारी उपस्थित थे। इस अवसर पर ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान पर आधारित एक जानकारी पुस्तिका का भी राज्यपाल के हाथों विमोचन किया गया।
राज्यपाल ने कहा कि आज बृहन्मुंबई और आसपास के क्षेत्रों की आबादी लगभग दो करोड़ तक पहुंच चुकी है। अत्यधिक जनसंख्या घनत्व के कारण टीबी जैसे संक्रामक रोगों के फैलने का खतरा अधिक रहता है। इसी को ध्यान में रखते हुए महाराष्ट्र लोकभवन की पहल पर ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान शुरू किया गया है, जिसमें जनभागीदारी अत्यंत आवश्यक है।
राज्यपाल ने कहा कि यदि मुंबई को टीबी मुक्त बनाने में सफलता मिलती है, तो यह केवल भारत ही नहीं बल्कि पूरे विश्व के लिए एक उदाहरण बनेगा और इससे मुंबई की वैश्विक छवि और अधिक मजबूत होगी।
उन्होंने बताया कि इस अभियान के विभिन्न चरणों में विश्वविद्यालयों और महाविद्यालयों के विद्यार्थी, रेड क्रॉस सोसायटी, एनसीसी, ‘माय युवा भारत’ के स्वयंसेवक, स्काउट्स एवं गाइड, स्वयंसेवी संस्थाएं तथा विभिन्न सामाजिक संगठनों को जोड़ा जाएगा।
राज्यपाल ने कहा कि समय पर उपचार से टीबी पूरी तरह ठीक हो सकती है तथा सरकार द्वारा इसकी जांच और उपचार की सुविधाएं निःशुल्क उपलब्ध कराई जाती हैं। यह जानकारी जन-जन तक पहुंचाना आवश्यक है।
उन्होंने कहा कि ‘विकसित भारत’ के लक्ष्य को प्राप्त करने के लिए भारत का टीबी मुक्त होना आवश्यक है और इस दिशा में ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान अत्यंत महत्वपूर्ण है। सरकार और समाज मिलकर कार्य करें तो सफलता अवश्य मिलती है।
कार्यक्रम के पूर्व राज्यपाल ने धारावी स्थित एकनाथराव गायकवाड हेल्थ सेंटर का दौरा कर क्षयरोग अधिकारियों, कर्मचारियों तथा आशा सेविकाओं से संवाद किया तथा टीबी मरीजों को पोषण आहार किट वितरित किए।
इस कार्यक्रम में राज्यपाल ने 30 क्षयरोग मरीजों के पोषण आहार की जिम्मेदारी स्वीकार की। राज्यपाल के इस निर्णय के लिए महापौर रितू तावडे ने उन्हें ‘निक्षय मित्र’ प्रमाणपत्र प्रदान किया।
इस अवसर पर राज्यपाल के हाथों भारत पेट्रोलियम, नायरा एनर्जी, अदानी फाउंडेशन तथा मेट्रोपोलीस हेल्थकेअर को क्षयरोग उन्मूलन अभियान में उनके योगदान के लिए प्रशस्ति प्रमाणपत्र प्रदान किए गए।