बंद

    11.05.2026: सोमनाथ मंदिर देशाच्या आत्म्याचे प्रतीक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    प्रकाशित तारीख : May 11, 2026
    Governor visits Shri Dhakaleshwar Mahadev Temple and perform Abhishek and Pooja

    सोमनाथ मंदिर देशाच्या आत्म्याचे प्रतीक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    सौराष्ट्र येथील सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचे प्रतीक आहे. कितीही आक्रमक आलेत तरी देखील सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचे सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी येथे केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. ११ मे) सोमनाथ येथे झालेल्या ‘सोमनाथ स्वाभिमान पर्वाचे औचित्य साधून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महालक्ष्मी मंदिर मुंबई येथील श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात जाऊन अभिषेक व पूजा केली. त्यानंतर राज्यपाल उपस्थितांना संबोधित करीत होते.

    एक हजार वर्षांपूर्वी गझनीने सोमनाथ मंदिर लुटले. त्यानंतर देखील हे मंदिर अनेकदा लुटले गेले. मंदिराचे सर्व लुटारू नामशेष झाले परंतु मंदिर जेथील तेथेच उभे आहे. परकीय आक्रमकांनी देशाला लुटले, अत्याचार केले परंतु भारत कधीही हरला नाही. त्यामुळे सनातनाचा कधीही अंत होत नाही असे राज्यपालांनी सांगितले.

    स्वयंभू ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने सात जन्मांचे पाप नाहीसे होते या अर्थाचा श्लोक उद्धृत करून ‘सोमनाथ पर्व’ हे अनादी, अमर व अनंत अश्या सनातन धर्माचा उत्सव असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांनी सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांचेसह पंतप्रधानांच्या सोमनाथ मंदिरातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले तसेच सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त धाकलेश्वर मंदिर परिसरात आयोजित चित्र प्रदर्शनाला भेट दिली.

    कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे, श्री धाकलेश्वर महादेव मंदिर न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्त अशोक भन्साळी, विश्वस्त उमा अमित भन्साळी, तसेच इतर विश्वस्त व भाविक उपस्थित होते.

    सोमनाथ मंदिर देश की आत्मा का प्रतीक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    सौराष्ट्र स्थित सोमनाथ मंदिर केवल एक मंदिर नहीं, बल्कि देश की आत्मा का प्रतीक है। कितने भी आक्रमणकारी आए हों, सनातन संस्कृति का कभी अंत नहीं हो सकता, इसका सबसे बड़ा उदाहरण सोमनाथ मंदिर है, ऐसा प्रतिपादन महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने किया।

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की उपस्थिति में सोमवार (11 मई) को सोमनाथ में आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ के अवसर पर राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने मुंबई स्थित श्री धाकलेश्वर महादेव मंदिर में जाकर अभिषेक एवं पूजा की। इसके बाद वे उपस्थित जनसमूह को संबोधित कर रहे थे।
    राज्यपाल ने कहा कि एक हजार वर्ष पूर्व गज़नी ने सोमनाथ मंदिर को लूटा था। इसके बाद भी मंदिर को कई बार लूटा गया, लेकिन मंदिर के सभी लुटेरे इतिहास से मिट गए, जबकि मंदिर आज भी अडिग खड़ा है।

    विदेशी आक्रमणकारियों ने देश को लूटा और अत्याचार किए, परंतु भारत कभी पराजित नहीं हुआ। इसलिए सनातन का कभी अंत नहीं हो सकता।

    स्वयंभू ज्योतिर्लिंगों के दर्शन से सात जन्मों के पाप नष्ट हो जाते हैं, इस आशय का श्लोक उद्धृत करते हुए राज्यपाल ने कहा कि ‘सोमनाथ पर्व’ अनादि, अमर और अनंत सनातन धर्म का उत्सव है।

    इस अवसर पर राज्यपाल ने सांस्कृतिक कार्य, सूचना प्रौद्योगिकी एवं कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार के साथ प्रधानमंत्री के सोमनाथ मंदिर कार्यक्रम का सीधा प्रसारण देखा तथा ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ के उपलक्ष्य में धाकलेश्वर मंदिर परिसर में आयोजित चित्र प्रदर्शनी का अवलोकन किया।

    कार्यक्रम में राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सांस्कृतिक कार्य विभाग के सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य निदेशक श्रीराम पांडे, श्री धाकलेश्वर महादेव मंदिर न्यास के अध्यक्ष एवं विश्वस्त अशोक भंसाली, विश्वस्त उमा अमित भंसाली तथा अन्य विश्वस्त और श्रद्धालु उपस्थित थे।