बंद

    महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: April 16, 2019

    राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

    “महावीर जयंतीचा पवित्र दिवस भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, जीवदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण देतो. राज्यातील सर्व लोकांना, मी महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो”, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.