19.02.2026 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकचा समारोप
19.02.2026 : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सुरु असलेल्या 'मुंबई क्लायमेट वीक' या तीन दिवसांच्या पर्यावरण परिषदेचा समारोप झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ९ संस्था व स्टार्टअप्स यांना पर्यावरण क्षेत्रातील 'इनोव्हेशन चॅलेंज' पुरस्कार प्रदान करण्यात आले. चर्चासत्राचे आयोजन 'प्रोजेक्ट मुंबई' या संस्थेने महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने केले. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, 'प्रोजेक्ट मुंबई'चे संस्थापक शिशिर जोशी, सदस्य जलज दाणी, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ञ, अभ्यासक व शासनाचे अधिकारी उपस्थित होते. भूतलावरील कुठल्याही प्राण्याने निसर्ग व पर्यावरणाचे नुकसान केले नाही. त्याउलट सर्वात सुज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. पर्यावरण रक्षणाची चर्चा करताना त्यामध्ये शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देखील विचार झाला पाहिजे असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यावेळी केले.
19.02.2026 : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सुरु असलेल्या 'मुंबई क्लायमेट वीक' या तीन दिवसांच्या पर्यावरण परिषदेचा समारोप झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ९ संस्था व स्टार्टअप्स यांना पर्यावरण क्षेत्रातील 'इनोव्हेशन चॅलेंज' पुरस्कार प्रदान करण्यात आले. चर्चासत्राचे आयोजन 'प्रोजेक्ट मुंबई' या संस्थेने महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने केले. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, 'प्रोजेक्ट मुंबई'चे संस्थापक शिशिर जोशी, सदस्य जलज दाणी, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ञ, अभ्यासक व शासनाचे अधिकारी उपस्थित होते. भूतलावरील कुठल्याही प्राण्याने निसर्ग व पर्यावरणाचे नुकसान केले नाही. त्याउलट सर्वात सुज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. पर्यावरण रक्षणाची चर्चा करताना त्यामध्ये शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देखील विचार झाला पाहिजे असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यावेळी केले.