07.08.2026: जाहिरात क्षेत्राने नैतिकता आणि पारदर्शकता जपावी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
जाहिरात क्षेत्राने नैतिकता आणि पारदर्शकता जपावी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपले योगदान देताना जाहिरात क्षेत्राने नैतिकता व पारदर्शकता जपावी आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करु नये, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (आयएए) इंडिया चॅप्टरतर्फे मुंबई येथे शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) आयोजित १३ व्या आयएए लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल बोलत होते.
नेतृत्व हे केवळ व्यावसायिक यश किंवा बाजारपेठेतील हिस्स्यावरून मोजले जात नाही, तर समाजाचा विश्वास संपादन करण्याची, संधी निर्माण करण्याची आणि समाजहिताची संस्थात्मक उभारणी करण्याची क्षमता हेच खऱ्या नेतृत्वाचे मापदंड आहेत, असे राज्यपालांनी सांगितले.
जाहिरात ही केवळ उत्पादनांचा प्रचार करणारी नसून ती लोकांच्या आकांक्षांना दिशा देते, ग्राहकांच्या वर्तनावर प्रभाव टाकते आणि देशाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावणाऱ्या ब्रँड्सना बळकटी देते, असे ते म्हणाले.
भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या जाहिरात बाजारपेठांपैकी एक असून देशातील जाहिरात व माध्यम उद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांहून अधिक असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माहिती-आधारित विपणनामुळे ब्रँड्स आणि ग्राहक यांच्यातील संवादाची पद्धत झपाट्याने बदलत असून सर्जनशीलता आणि नवोन्मेष यांचे महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिलीप संघवी यांना कॉर्पोरेट उत्कृष्टतेसाठीचा ‘आयएए बिझनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (आयएए) इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष अभिषेक कर्नानी, पुरस्कार निवड मंडळाच्या अध्यक्षा प्रभा नरसिंहन, आयएए लीडरशिप अवॉर्ड्सच्या अध्यक्षा नंदिनी डायस, यांसह विविध उद्योग क्षेत्रांतील मान्यवर तसेच २०२६ सालच्या आयएए बिझनेस लीडर पुरस्कारांचे मानकरी उपस्थित होते।
**
विज्ञापन उद्योग को नैतिकता और पारदर्शिता बनाए रखनी चाहिए : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
विकसित भारत के निर्माण में अपना योगदान देते हुए विज्ञापन उद्योग को नैतिकता एवं पारदर्शिता का पालन करना चाहिए तथा भ्रामक विज्ञापन नहीं करने चाहिए। महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने यह आह्वान किया।
राज्यपाल शुक्रवार (7 अगस्त) को मुंबई में इंटरनेशनल एडवरटाइजिंग एसोसिएशन (आईएए) इंडिया चैप्टर द्वारा आयोजित 13वें आईएए लीडरशिप पुरस्कार समारोह को संबोधित कर रहे थे।
राज्यपाल ने कहा कि नेतृत्व का मूल्यांकन केवल व्यावसायिक सफलता या बाजार हिस्सेदारी से नहीं किया जाता, बल्कि समाज का विश्वास अर्जित करने, अवसरों का सृजन करने तथा समाजहित में संस्थाओं का निर्माण करने की क्षमता ही सच्चे नेतृत्व का मापदंड है।
उन्होंने कहा कि विज्ञापन केवल उत्पादों का प्रचार नहीं करता, बल्कि लोगों की आकांक्षाओं को दिशा देता है, उपभोक्ताओं के व्यवहार को प्रभावित करता है तथा देश की आर्थिक प्रगति में योगदान देने वाले ब्रांडों को सशक्त बनाता है।
राज्यपाल ने कहा कि भारत विश्व के सबसे तेजी से बढ़ते विज्ञापन बाजारों में से एक है तथा देश के विज्ञापन एवं मीडिया उद्योग का आकार एक लाख करोड़ रुपये से अधिक हो चुका है।
उन्होंने कहा कि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) और डेटा-आधारित विपणन के कारण ब्रांडों और उपभोक्ताओं के बीच संवाद का स्वरूप तेजी से बदल रहा है, जिससे रचनात्मकता और नवाचार का महत्व पहले से कहीं अधिक बढ़ गया है।
इस अवसर पर राज्यपाल ने सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड के संस्थापक, अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक दिलीप संघवी को कॉर्पोरेट उत्कृष्टता के लिए ‘आईएए बिजनेस लीडर ऑफ द ईयर’ पुरस्कार प्रदान किया।
समारोह में इंटरनेशनल एडवरटाइजिंग एसोसिएशन (आईएए) इंडिया चैप्टर के अध्यक्ष अभिषेक कर्नानी, पुरस्कार चयन समिति की अध्यक्षा प्रभा नरसिम्हन, आईएए लीडरशिप अवॉर्ड्स की अध्यक्षा नंदिनी डायस, विभिन्न उद्योग क्षेत्रों के अनेक गणमान्य व्यक्तियों तथा वर्ष 2026 के आईएए बिजनेस लीडर पुरस्कारों से सम्मानित हस्तियाँ उपस्थित थीं।