बंद

    20.06.2026 : महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा

    प्रकाशित तारीख : June 20, 2026
    महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा

    महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा

    पश्चिम बंगालचे उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्द राज्यपालांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला कौतुकाची थाप

    महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन शनिवारी (दि. २०) सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी बंगाली गीत व नृत्याच्या माध्यमातून उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाला व विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

    केंद्र शासनाच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत पश्चिम बंगालचा राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.

    महाराष्ट्र व पश्चिम बंगाल परस्परांपासून दोन हजार किमी दूर असले तरी देखील दोन्ही राज्यांमधील लोकांची अस्मिता समान असल्याचे यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.
    दोन्ही राज्यांना इतिहास, संस्कृती, अध्यात्म व राष्ट्रवादाच्या जाणिवेने जोडले असून दोन्ही राज्यांनी गौरांग महाप्रभु, संत तुकाराम, अहिल्यादेवी होळकर, स्वामी विवेकानंद यांसारखे महान प्रभृती दिल्या असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दोन्ही राज्यांनी देशाला नेतृत्व प्रदान केले. बंगालने सुभाषचंद्र बोस व बिपीन चंद्र पाल यांसारखे नेते दिले तर महाराष्ट्राने लोकमान्य टिळक, गोखले यांसह अनेक नेते दिले असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

    बंगालप्रमाणेच महाराष्ट्र देखील साहित्य व संस्कृती प्रेमी राज्य असल्याचे आपण अनुभवले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. बंगालने साहित्य – संगीत जगतात फार मोठे योगदान दिले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. जो विचार बंगाल आज करतो तो विचार देश दुसऱ्या दिवशी करतो असे म्हटले जाते, असे सांगून बंगालच्या सुपुत्रांनी देशाला ‘वंदे मातरम’ व ‘जन गण मन’ ही दोन्ही राष्ट्रीय गीते दिली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तर कोलकाता ही सांस्कृतिक राजधानी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. बंगाली भाषा सुमधुर असून रसगुल्ल्याप्रमाणे गोड असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
    यावेळी सोलापूर येथील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दुर्गा पूजेचे गीत ‘हे लो गिरी सून लो खोबोर’, पश्चिम बंगालच्या अजरामर व्यक्तिमत्वांची गाथा सांगणारे एकपात्री सादरीकरण, लोकनृत्य तसेच कथक नृत्य सादर केले.

    यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालची सांस्कृतिक परंपरा दाखविणारा संगीत व नृत्याचा कार्यक्रम सादर केला.

    कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, सांस्कृतिक समन्वयक, लोकभवनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबईतील विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.

    *****

    महाराष्ट्र लोकभवन में पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस का आयोजन

    पश्चिम बंगाल की उत्कृष्ट सांस्कृतिक प्रस्तुति के लिए राज्यपाल ने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय की सराहना की

    मुंबई स्थित महाराष्ट्र लोकभवन में शनिवार (20 जून) को पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से उत्साहपूर्वक मनाया गया। इस अवसर पर महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने महाराष्ट्र सहित देश के विभिन्न भागों में निवास कर रहे पश्चिम बंगाल के नागरिकों को राज्य स्थापना दिवस की शुभकामनाएँ दीं।

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय के मराठी भाषी विद्यार्थियों द्वारा बंगाली गीतों एवं नृत्यों के माध्यम से प्रस्तुत उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम की राज्यपाल ने विशेष प्रशंसा की तथा विश्वविद्यालय और विद्यार्थियों को बधाई दी।

    यह कार्यक्रम केंद्र सरकार के ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियान के अंतर्गत आयोजित किया गया। कार्यक्रम के प्रारंभ में पश्चिम बंगाल के राज्यपाल आर. एन. रवि का वीडियो संदेश प्रदर्शित किया गया।

    इस अवसर पर संबोधित करते हुए राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने कहा कि महाराष्ट्र और पश्चिम बंगाल भले ही एक-दूसरे से लगभग दो हजार किलोमीटर दूर हों, लेकिन दोनों राज्यों के लोगों की अस्मिता, सांस्कृतिक चेतना और राष्ट्रीय भावना समान है। उन्होंने कहा कि दोनों राज्यों को इतिहास, संस्कृति, अध्यात्म और राष्ट्रवाद की भावना ने एक सूत्र में बाँध रखा है। दोनों राज्यों ने गौरांग महाप्रभु, संत तुकाराम, अहिल्यादेवी होळकर और स्वामी विवेकानंद जैसी महान विभूतियाँ देश को दी हैं।

    राज्यपाल ने कहा कि भारत के स्वतंत्रता संग्राम में भी दोनों राज्यों ने देश को महत्वपूर्ण नेतृत्व प्रदान किया। बंगाल ने नेताजी सुभाषचंद्र बोस और बिपिन चंद्र पाल जैसे महान नेता दिए, जबकि महाराष्ट्र ने लोकमान्य बाल गंगाधर तिलक, गोपाल कृष्ण गोखले सहित अनेक राष्ट्रीय नेताओं को जन्म दिया।

    उन्होंने कहा कि जिस प्रकार बंगाल साहित्य और संस्कृति के प्रति समर्पित राज्य है, उसी प्रकार महाराष्ट्र भी साहित्य और संस्कृति प्रेमियों की भूमि है। बंगाल ने साहित्य और संगीत के क्षेत्र में अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिया है। यह प्रसिद्ध उक्ति है कि “आज बंगाल जो सोचता है, देश कल वही सोचता है।” उन्होंने कहा कि बंगाल की महान संतानों ने देश को ‘वंदे मातरम्’ और ‘जन गण मन’ जैसे राष्ट्रीय गीत प्रदान किए हैं।

    राज्यपाल ने कहा कि मुंबई देश की आर्थिक राजधानी है, जबकि कोलकाता सांस्कृतिक राजधानी के रूप में विख्यात है। उन्होंने बंगाली भाषा को अत्यंत मधुर बताते हुए कहा कि यह रसगुल्ले की तरह मीठी है।

    इस अवसर पर विश्वविद्यालय के विद्यार्थियों ने दुर्गा पूजा पर आधारित गीत ‘हेलो गिरी सुनो खबर’, पश्चिम बंगाल की महान विभूतियों की गाथा पर आधारित एकल अभिनय, लोकनृत्य तथा कथक नृत्य प्रस्तुत किया।

    कार्यक्रम में पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय के विद्यार्थियों ने पश्चिम बंगाल की समृद्ध सांस्कृतिक परंपरा को दर्शाने वाला संगीत एवं नृत्य कार्यक्रम प्रस्तुत किया।

    इस अवसर पर विश्वविद्यालय के कुलपति प्रो. प्रकाश महानवर, राज्यपाल के सह सचिव एस. राममूर्ति, सांस्कृतिक समन्वयक, लोकभवन के अधिकारी एवं कर्मचारी तथा मुंबई की विभिन्न शालाओं के विद्यार्थी उपस्थित थे।