बंद

    21.03.2026: उपराष्ट्रपतींच्या हस्ते लोकभवन येथे जैन साहित्य प्रदर्शनाचे उदघाटन

    प्रकाशित तारीख : March 21, 2026
    Vice President inaugurates Jain Exhibition at Lok Bhavan

    उपराष्ट्रपतींच्या हस्ते लोकभवन येथे जैन साहित्य प्रदर्शनाचे उदघाटन

    उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शनिवारी (दि. 21) महाराष्ट्र लोकभवन येथे जैन दीक्षा महोत्सवाला उपस्थित राहून जैन साहित्य प्रदर्शनाचे उदघाटन केले.

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपराष्ट्रपतींनी जैन तीर्थंकर मुर्ती व प्राचीन जैन साहित्याच्या प्रदर्शनाला भेट दिली.

    भगवान महावीर यांची शिकवण आज पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे. आपल्या आचरणातून त्यांनी त्याग व साध्या राहणीचा संदेश दिला असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

    जैन धर्मात सर्वसंग परित्याग करुन समाज सेवा करण्याची श्रेष्ठ परंपरा आहे व ती अनुकरणीय आहे असे उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. तामिळनाडू राज्यात एकेकाळी दोन तृतीयांश लोक जैन धर्माचे पालन करीत होते असे सांगून जैन साधूंनी तामिळ साहित्यामध्ये फार मोठे योगदान दिले असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

    जैन धर्माने भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्यात मोठे योगदान दिले आहे असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी सांगितले. जैन धर्मातील दीक्षा विधी हा सनातन संस्कृतीचा भाग असल्याचे सांगून उत्तर पुर्वेतील त्रिपुरा व नागालँड राज्यात देखील जैन समाज योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

    सर्व संपत्तीवर पाणी सोडून संन्यास घेण्याची परंपरा केवळ भारतात आहे असे सांगून अहिंसा म्हणजे केवळ शारीरिक हिंसा नसून हिंसक विचार करणे देखील एक प्रकारे हिंसा असल्याचे राज्यपालांनी सांगितले. अहिंसा हाच खरा धर्म आहे असे सांगून अहिंसा यशाचा मार्ग प्रशस्त करते असे राज्यपालांनी सांगितले.

    जैन समाजाचे देशाच्या सकल उत्पन्नात सर्वाधिक योगदान – मुख्यमंत्री

    जैन समाजाचे देशाच्या सकल उत्पन्नात सर्वाधिक योगदान असून दानधर्म करण्यात देखील जैन समाजाचे योगदान फार मोठे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

    जैन धर्मात केवळ मानवाच्या कल्याणाचाच नाही; तर जड आणि सूक्ष्म जीवांच्या कल्याणाचा देखील विचार केला आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    जैन धर्मियांनी हाती घेतलेले हस्तलिखितांच्या संरक्षणाचे कार्य प्रशंसनीय असल्याचे सांगून जैन धर्मियांनी राज्यातील जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात देखील सहयोग करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

    यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते जैन दीक्षा घेणाऱ्या युवकांचा तसेच जैन साहित्य संरक्षणासाठी सहयोग करणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, श्री अध्यात्म परिवार ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त हितेंद्र मोता, विश्वस्त राजेश चंदन, विश्वस्त बाबुलाल भन्साळी उपस्थित होते.

    दिनांक ८ फेब्रुवारी रोजी बोरिवली येथे विविध राज्यातील व विविध वयोगटातील १८ पुरुष व ४६ महिलांनी जैन दीक्षा घेतली. त्यानिमित्त जैन दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

    **

    उपराष्ट्रपति के हस्ते लोकभवन में जैन साहित्य प्रदर्शनी का उद्घाटन

    भारत के उपराष्ट्रपति सी पी राधाकृष्णन ने शनिवार (21 मार्च) को महाराष्ट्र लोकभवन में जैन दीक्षा महोत्सव में उपस्थित रहकर जैन साहित्य प्रदर्शनी का उद्घाटन किया।

    इस अवसर पर राज्यपाल जिष्णु देव वर्मा तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ उपराष्ट्रपति ने जैन तीर्थंकरों की प्रतिमाओं और प्राचीन जैन ग्रंथों की प्रदर्शनी का अवलोकन किया।

    उपराष्ट्रपति ने कहा कि महावीर की शिक्षाएं आज पहले से अधिक प्रासंगिक हैं। उन्होंने अपने जीवन से त्याग और सादगी का संदेश दिया। जैन धर्म में संसार का त्याग कर समाज सेवा करने की महान परंपरा है, जो अनुकरणीय है। उन्होंने यह भी उल्लेख किया कि एक समय तामील नाडू में लगभग दो-तिहाई लोग जैन धर्म का पालन करते थे और जैन संतों ने तमिल साहित्य में महत्वपूर्ण योगदान दिया है।

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने कहा कि जैन धर्म ने भारतीय संस्कृति के संरक्षण में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। उन्होंने बताया कि दीक्षा परंपरा सनातन संस्कृति का अभिन्न हिस्सा है तथा त्रिपुरा और नागालँड जैसे पूर्वोत्तर राज्यों में भी जैन समाज का योगदान उल्लेखनीय है।

    राज्यपाल ने कहा कि संपूर्ण संपत्ति का त्याग कर संन्यास लेने की परंपरा केवल भारत में ही देखने को मिलती है। अहिंसा केवल शारीरिक हिंसा तक सीमित नहीं है, बल्कि हिंसक विचार भी हिंसा का ही एक रूप है। उन्होंने कहा कि अहिंसा ही सच्चा धर्म है और यही सफलता का मार्ग प्रशस्त करती है।

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि जैन समाज का देश के सकल आय में महत्वपूर्ण योगदान है और दान-धर्म में भी उनकी भूमिका अत्यंत महत्वपूर्ण है। जैन धर्म में केवल मानव ही नहीं, बल्कि सभी जड़ एवं सूक्ष्म जीवों के कल्याण का विचार किया गया है।

    मुख्यमंत्री ने जैन समाज द्वारा प्राचीन हस्तलिखित ग्रंथों के संरक्षण के कार्य की सराहना की तथा राज्य के पुराने मंदिरों के जीर्णोद्धार में सहयोग करने का आह्वान किया।

    इस अवसर पर उपराष्ट्रपति ने जैन दीक्षा ग्रहण करने वाले युवाओं तथा जैन साहित्य संरक्षण में सहयोग देने वाले दानदाताओं का सम्मान किया।

    कार्यक्रम में कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, श्री अध्यात्म परिवार ट्रस्ट के प्रबंध न्यासी हितेंद्र मोटा तथा न्यासी राजेश चंदन और बाबूलाल भंसाली उपस्थित थे।

    इसी साल 8 फरवरी को बोरीवली में विभिन्न राज्यों एवं आयु वर्ग के 18 पुरुषों और 46 महिलाओं ने जैन दीक्षा ग्रहण की थी, जिसके उपलक्ष्य में जैन दीक्षा महोत्सव का आयोजन किया गया।