23.02.2026: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी – राज्यपाल आचार्य देवव्रत
वृत्त 566 दि 23 फेब्रुवारी 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी
– राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई, दि. २३ : युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ केलेले कार्य राज्याच्या सर्वच क्षेत्रांत आजही प्रकर्षाने जाणवते, असे सांगून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांच्या सहज, सरळ आणि सर्वांना आपलेसे करून घेणाऱ्या स्वभावाचा विशेष उल्लेख केला.
दिवंगत अजित पवार यांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठेवा ठरेल आणि समाजजीवनाला दिशा देणारे ठरेल, असेही राज्यपालांनी नमूद केले.
वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित दिवंगत अजित यांच्या श्रद्धांजली सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर , विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी सरन्यायाधिश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, उद्योजक गौतम अदानी, मुकेश अंबानी, अभिनेते नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, मंत्रीमंडळातील मंत्री, विधानसभा आणि विधान परिषदे सदस्य उपस्थित होते.
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, निसर्गाने मानवाला काही मर्यादा घातल्या असल्या तरी त्याने जगलेले जीवन आणि समाजातील दुःखी व गरजू घटकांना दिलेला आधार यावरच त्याचे खरे महानत्व ठरते. “कीर्ती यशस्य जीवति” या तत्त्वानुसार महान व्यक्तींचे कर्तृत्व आणि त्यांचे आदर्श विचार त्यांना अमरत्व प्रदान करतात. अशा व्यक्तींची कीर्ती कोणत्याही काळात किंवा परिस्थितीत नष्ट होऊ शकत नाही, असे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटले.
दिवंगत अजित पवार हेच महाराष्ट्राचे खरे ‘रिअल स्टार’
— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले योगदान दिले. त्यांच्या कार्याचा ठसा हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. राज्याच्या जडणघडणीच्या इतिहासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. दिवंगत अजित पवार हेच महाराष्ट्राचे खरे ‘ रिअल स्टार’ आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोकसभेत म्हणाले, दिवंगत अजित पवार हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्याची माहिती त्यांना होती. उत्तम प्रशासकासाठी जे गुण आवश्यक असले पाहिजे ते संपूर्ण गुण अजितदादांमध्ये होते. त्यांनी केवळ अर्थसंकल्प मांडले नाहीत, तर त्यामधून राज्याला आर्थिक शिस्त लावली. लोकहिताचे निर्णय घेताना आर्थिक घडी विस्कटू नये, याची कटाक्षाने काळजी ते घ्यायचे. मंत्रिमंडळासमोर येताना त्यांचा प्रत्येक विषयाचा अभ्यास असायचा. प्रचंड निर्णय क्षमता असल्यामुळे ते तात्काळ निर्णय घेत दिलेला शब्द ते कधीही परत घ्यायचे नाहीत. ते परखडही होते.
उत्तम प्रशासन चालविण्याचे त्यांचे कौशल्य होते. त्यासाठी आवश्यक असलेली जरब त्यांच्याकडे होती. नेमकेपणा, शिस्त हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. राज्याच्या हिताचे नसलेले निर्णय ठामपणे रद्द करण्याचे त्यांचे धाडसही अनुभवले आहे. सार्वजनिक जीवनात त्यांचा जनसंपर्क होता, यासोबतच वैयक्तिक संबंध ठेवण्यातही त्यांची हातोटी होती.
महाराष्ट्रचा विकासाची गती कमी होऊ दिली नाही
– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासाची गती कमी होऊ दिली नाही, यासाठी विकासकामांच्या दर्जात तडजोड केली नाही. आपली मते परखडपणे मांडताना, विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीत काटकसर धोरणचा पाठपुरावा देखील करायचे आणि विकास प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी निधी तरतूद करताना अभ्यास पूर्ण माहिती सादर करीत असे नमूद करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करताना राज्याच्या आर्थिक स्थितीचा आणि विकासाचा ताळमेळ साधण्याचं अवघड काम त्यांनी केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस व काम सुरू व्हायचे. महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, अजित दादा आणि आमच्यातील समन्वय अतिशय चांगला आणि एकमेकांच्या मनातील ओळखणारा होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, विकास दृष्टी असलेल्या नेत्याला आपण गमावले आहे. नुकतेच पुण्यासाठी काही तरी करा म्हणून त्यांचा पाठपुरावा सुरू होता, यातून केंद्र सरकार कडून या तीन मजली उन्नत पुल मंजूर केला होता.
विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी नवी दिल्ली, नागपूर येथे देखील भेट घेऊन माहिती द्यायचे. फक्त प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा न करता प्रत्यक्ष विकास प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देऊन जबाबदारीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रगतीचा आढावा घेताना त्यांना पाहिले. असे केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी म्हणाले
यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच मुलं पार्थ व जय यासह पवार कुटुंबीयाच्या सांत्वनसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धांजली सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनावरील आणि राजकीय कौटुंबिक क्षेत्रातील कारकीर्द यावर चित्रफितीं प्रदर्शित करण्यात आल्या. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
००००
किरण वाघ/विसंअ
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार का कार्य आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणादायी
– राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई, 23 फरवरी : महाराष्ट्र के राज्यपाल आचार्य देवव्रत ने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार के व्यक्तित्व का गौरव करते हुए कहा कि युवाओं, किसानों और आम नागरिकों के कल्याण के लिए उन्होंने तीन दशकों से अधिक समय तक जो कार्य किया, उसका प्रभाव आज भी राज्य के सभी क्षेत्रों में स्पष्ट रूप से अनुभव किया जाता है। राज्यपाल ने उनके सरल, सहज और सबको अपना बना लेने वाले स्वभाव का विशेष उल्लेख किया।
उन्होंने कहा कि दिवंगत अजित पवार का कार्य आने वाली कई पीढ़ियों के लिए प्रेरणा का स्रोत रहेगा और समाज जीवन को दिशा देने वाला सिद्ध होगा।
वर्ली स्थित एनएससीआई डोम में आयोजित श्रद्धांजलि सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापति प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी, पूर्व सरन्यायाधीश भूषण गवई, पूर्व मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उद्योगपति गौतम अदानी, मुकेश अंबानी, अभिनेता नाना पाटेकर, जैकी श्रॉफ, मंत्रिमंडल के सदस्य, विधानसभा और विधान परिषद के सदस्य उपस्थित थे।
राज्यपाल आचार्य देवव्रत ने कहा कि प्रकृति ने भले ही मनुष्य के जीवन की कुछ सीमाएँ निर्धारित की हों, लेकिन उसने समाज के दुःखी और जरूरतमंद वर्गों को जो सहारा दिया और जैसा जीवन जिया, उसी से उसकी वास्तविक महानता निर्धारित होती है। “कीर्ति यशस्य जीवति” के सिद्धांत के अनुसार महान व्यक्तियों का कर्तृत्व और उनके आदर्श विचार उन्हें अमरत्व प्रदान करते हैं। ऐसे व्यक्तियों की कीर्ति किसी भी काल या परिस्थिति में समाप्त नहीं होती।
दिवंगत अजित पवार ही महाराष्ट्र के सच्चे ‘रियल स्टार’
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि महाराष्ट्र के निर्माण और विकास में दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार का महत्वपूर्ण योगदान रहा है। उनके कार्यों की छाप महाराष्ट्र कभी नहीं भूलेगा। राज्य की विकास यात्रा के इतिहास में उनका योगदान अत्यंत मूल्यवान है। उन्होंने कहा कि दिवंगत अजित पवार ही महाराष्ट्र के सच्चे ‘रियल स्टार’ थे।
मुख्यमंत्री ने श्रद्धांजलि सभा में कहा कि अजित पवार वास्तविक अर्थों में महाराष्ट्र के जननेता थे। उन्हें राज्य के कोने-कोने की जानकारी थी। एक उत्तम प्रशासक के लिए जो गुण आवश्यक होते हैं, वे सभी गुण उनमें विद्यमान थे। उन्होंने केवल बजट प्रस्तुत नहीं किए, बल्कि राज्य में आर्थिक अनुशासन भी स्थापित किया। लोकहित के निर्णय लेते समय राज्य की आर्थिक स्थिति संतुलित रहे, इसका वे विशेष ध्यान रखते थे। मंत्रिमंडल की बैठक में प्रत्येक विषय पर उनका गहन अध्ययन होता था। उनकी निर्णय क्षमता अत्यंत प्रभावी थी और वे दिए गए वचन से कभी पीछे नहीं हटते थे। वे स्पष्टवादी भी थे।
सशक्त प्रशासन चलाने की उनमें अद्वितीय क्षमता थी और आवश्यक दृढ़ता भी उनके व्यक्तित्व का हिस्सा थी। सटीकता और अनुशासन उनके स्वभाव में रचे-बसे थे। राज्यहित के विरुद्ध किसी भी निर्णय को वे दृढ़तापूर्वक रद्द करने का साहस रखते थे। सार्वजनिक जीवन में उनका व्यापक जनसंपर्क था और व्यक्तिगत संबंधों को बनाए रखने की विशेष कला भी उनमें थी।
महाराष्ट्र के विकास की गति कम नहीं होने दी
– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि अजित दादा ने महाराष्ट्र के विकास की गति कभी कम नहीं होने दी और विकास कार्यों की गुणवत्ता से कोई समझौता नहीं किया। वे मंत्रिमंडल की बैठकों में अपने विचार स्पष्ट रूप से रखते थे तथा विकास के लिए मितव्ययिता की नीति का समर्थन करते थे। विकास परियोजनाओं के लिए निधि आवंटन करते समय वे पूरी तैयारी और अध्ययन के साथ जानकारी प्रस्तुत करते थे।
उन्होंने कहा कि ‘लाडकी बहन’ योजना के लिए प्रावधान करते समय राज्य की आर्थिक स्थिति और विकास के बीच संतुलन स्थापित करने का कठिन कार्य उन्होंने किया। उनका दिन सुबह छह बजे से ही कार्य के साथ प्रारंभ हो जाता था। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा और हम सभी के बीच विकास को लेकर उत्कृष्ट समन्वय और परस्पर समझ थी।
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि विकास दृष्टि रखने वाले एक नेता को हमने खो दिया है। हाल ही में उन्होंने पुणे के लिए विशेष पहल करने का आग्रह किया था, जिसके परिणामस्वरूप केंद्र सरकार ने तीन मंजिला उन्नत पुल को मंजूरी दी। वे केवल परियोजनाओं की स्वीकृति तक सीमित नहीं रहते थे, बल्कि नई दिल्ली और नागपुर में बैठकों के माध्यम से उनका लगातार अनुसरण करते थे और स्वयं परियोजना स्थलों पर जाकर प्रगति की समीक्षा करते थे।
इस अवसर पर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार की पत्नी सुनेत्रा अजित पवार तथा उनके पुत्र पार्थ और जय सहित पवार परिवार को सांत्वना देने के लिए विभिन्न क्षेत्रों के अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।
श्रद्धांजलि सभा में दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार के जीवन और उनके राजनीतिक एवं पारिवारिक जीवन पर आधारित चित्रफितें प्रदर्शित की गईं। विभिन्न क्षेत्रों के मान्यवरों ने उन्हें श्रद्धांजलि अर्पित की।
000