27.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ”घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न
ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ”घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न
महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ या कथासंग्रहाचे प्रकाशन मंगळवारी (दि. २७ जाने.) लोकभवन मुंबई येथे करण्यात आले. ‘हाय ऑन कसोल’ या पुस्तकाचे लेखक, पत्रकार व अध्यापक आदित्य कांत हे या पुस्तकाचे लेखक आहेत.
पुस्तकाचे नाव जरी गुढ व भयप्रद वाटत असले तरी पुस्तकातील १८ कथांच्या माध्यमातून लेखकाने सामाजिक कार्य व सकारात्मकतेचा संदेश दिला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल देवव्रत यांनी यावेळी केले.
भूत प्रेत या मानव निर्मित कल्पना असून देशाच्या अनेक भागात लोकांनी या विषयावर कथा रचल्या आहेत. लेखकाने या लोककथांचा उपयोग करून हृदयस्पर्शी कथा लिहिल्या असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
संवेदनशीलता हे मानवाची सर्वात मोठी ओळख असून साहित्याच्या माध्यमातून युवकांमध्ये संवेदनशीलतेची भावना वृद्धिंगत झाली तर त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन होईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. आज समाजमाध्यमे जरी प्रभावी असली तरीही, ग्रंथ हे माणसाचे सच्चे मित्र असून ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून शांती व आंतरिक खंबीरता लाभते असे राज्यपालांनी सांगितले.
कोरोना काळात आपण जीवन मरणाशी लढताना अतिदक्षता विभागात मरण जवळून पाहिले. तशाही स्थितीत इतर कोरोना रुग्णांना मदत करण्याची आपल्याला आंतरिक इच्छा होती असे सांगून पुस्तकातील विविध प्रकाराने परस्पर सहकार्याची भवन, पर्यावरण जागृती निर्माण करते असे लेखक आदित्य कांत यांनी यावेळी सांगितले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रेड चिलीज एन्टरटेन्मेण्टच्या व्यवसाय व्यवस्थापिका करुणा बडवाल, संगीतकार संजीव वाधवानी व चित्रपट निर्माते राजन खोसा यांसह मनोरंजन व माध्यम क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.
राज्यपाल आचार्य देवव्रत के कर-कमलों से ‘घोस्ट्स, हॉरर एंड हिल्स’ कथा-संग्रह का विमोचन संपन्न
महाराष्ट्र और गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत के कर-कमलों से आज ‘घोस्ट्स, हॉरर एंड हिल्स’ नामक कथा-संग्रह का विमोचन मुंबई स्थित लोक भवन में किया गया। ‘हाई ऑन कसोल’ पुस्तक के लेखक आदित्य कांत इस कथा-संग्रह के लेखक हैं।
इस अवसर पर राज्यपाल देवव्रत ने कहा कि यद्यपि पुस्तक का नाम रहस्यमय और भयप्रद प्रतीत होता है, तथापि पुस्तक में शामिल 18 कहानियों के माध्यम से लेखक ने सामाजिक सेवा और सकारात्मकता का संदेश दिया है। भूत-प्रेत मानव-निर्मित कल्पनाएँ हैं और विभिन्न क्षेत्रों में लोगों ने इस विषय पर अनेक कथाएँ रची हैं। राज्यपाल ने कहा कि लेखक ने इन कल्पनाओं का उपयोग करते हुए हृदयस्पर्शी कहानियाँ लिखी हैं।
राज्यपाल ने कहा कि संवेदनशीलता मानव की सबसे बड़ी पहचान है और यदि साहित्य के माध्यम से समाज में, विशेषकर युवाओं में, संवेदनशीलता की भावना का संवर्धन हो, तो उससे समाज में सकारात्मक परिवर्तन संभव है। उन्होंने यह भी कहा कि पुस्तकें मनुष्य की सच्ची मित्र होती हैं और पुस्तक-पठन से शांति तथा आंतरिक दृढ़ता प्राप्त होती है।
लेखक आदित्य कांत ने कोरोना काल के अनुभव साझा करते हुए कहा कि जीवन-मरण के संघर्ष के दौरान उन्होंने गहन चिकित्सा विभाग में मृत्यु को निकट से देखा। ऐसी परिस्थितियों में भी अन्य कोरोना रोगियों की सहायता करने की उनके भीतर गहरी इच्छा थी। उन्होंने कहा कि पुस्तक की कहानियाँ विभिन्न रूपों में परस्पर सहयोग की भावना और पर्यावरण जागरूकता को प्रोत्साहित करती हैं।
पुस्तक विमोचन समारोह में फिल्म निर्माता राजन खोसा सहित मनोरंजन और मीडिया जगत से जुड़े अनेक आमंत्रित अतिथि उपस्थित थे।