बंद

    01.01.2026: कृषि विद्यापीठांनी पारंपारिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषि विद्यापीठांना सूचना

    प्रकाशित तारीख : January 2, 2026
    Governor presides over a review meeting on Natural Farming with officials of Agriculture Dept and VCs of agricultural universities

    कृषि विद्यापीठांनी पारंपारिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषि विद्यापीठांना सूचना

    राज्यात ‘नैसर्गिक शेती’ क्रांती आणण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा

    नैसर्गिक शेती लोकचळवळ व्हावी अशी व्यक्त केली अपेक्षा

    जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषि विद्यापीठांनी पारंपारिक देशी बियाणांना संस्कारित करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अश्या प्रकारचे बियाणे निर्माण करावे, असे सांगताना विद्यापीठांनी राज्यात नैसर्गिक शेती क्रांती आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.

    लोकभवन मुंबई येथून कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील कृषि व पशु विज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंशी गुरुवारी (दि. १) दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.

    बैठकीला कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, राज्यातील कृषि तसेच पशुविज्ञान विद्यापीठांचे कुलगुरु, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर व कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    संकरीत बियाणे शेतकऱ्यांसाठी संकट असून ते महाग देखील आहे. त्यांचा वापर केल्यास रासायनिक खते देखील जास्त लागतात. उत्पादित अन्नधान्याला चव नसते व त्याचे पोषणमूल्य देखील कमी असते. त्यामुळे विद्यापीठांनी पारंपारिक बियाण्यांवर संशोधन करुन त्याचे उन्नतीकरण करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

    सर्व कृषि विज्ञान केंद्रांनी नैसर्गिक शेतीच्या प्रचार प्रसारासाठी ‘मॉडेल फार्म’ विकसित करावे व शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी असे राज्यपालांनी सांगितले. नैसर्गिक शेती ही लोकचळवळ झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    नैसर्गिक शेती हे पवित्र असे ईश्वरी कार्य आहे. भावी पिढ्यांच्या अन्नसुरक्षेसाठी जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर नैसर्गिक शेतीशिवाय गत्यंतर नाही.

    बरेचदा शेतकरी थेट दुकानदारांकडे जाऊन दुकानदार सांगतील त्या प्रमाणात युरिया, डीएपी, कीटकनाशके खरेदी करतात व शेतात वापरतात. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. या दृष्टीने विद्यापीठांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे असेही राज्यपालांनी सांगितले.

    आपण महाराष्ट्रात नैसर्गिक शेती विषयावर घेतलेल्या दोन परिसंवादानंतर कृषि विभाग व विद्यापीठांनी हे कार्य सकारात्मक पद्धतीने हाती घेतले याबद्दल आपण समाधानी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    गुजरात मधील चार कृषि विद्यापीठे गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक शेती या विषयावर संशोधन करीत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी त्या विषयावर नव्याने संशोधन सुरु न करता गुजरात मधील संशोधन पुढे न्यावे. त्यांनी तयार केलेल्या संशोधन पत्रिका व पुस्तके राज्यातील विद्यापीठांना आपण उपलब्ध करून देऊ असे राज्यपालांनी सांगितले.

    आपण अलीकडे गावागावांमध्ये जाऊन लोकांमध्ये नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती करीत आहोत, असे राज्यपालांनी सांगितले. अशाच एका भेटीमध्ये आणंद जिल्ह्यात २५ गावांमध्ये आज भूमिगत जलस्त्रोतांमध्ये नायट्रेट आढळून आले असून पाणी पिण्यायोग्य राहिले नाही, ही गोष्ट निदर्शनास आली. दुषित पाण्यांमुळे लोकांना गंभीर आजार होत आहेत. या दृष्टीने रसायनांच्या वापराबाबत जागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याकडे एक गाय असली तरी देखील शेती करता येते हे त्यांना पटवून द्यावे लागेल असे राज्यपालांनी सांगितले.

    महाराष्ट्रात साहिवाल, थारपारकर, कांकरेज, गीर आदी देशी गायींचे संवर्धन केले गेल्यास ते शेतीला वरदान ठरेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असेही राज्यपालांनी सांगितले. यावेळी ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर यांनी सादरीकरण केले.
    **
    कृषि विश्वविद्यालय पारंपरिक देशी बीजों का उन्नयन करें : राज्यपाल आचार्य देवव्रत का कृषि विश्वविद्यालयों को निर्देश

    राज्य में ‘प्राकृतिक खेती’ की क्रांति लाने के लिए विश्वविद्यालय आगे आएं

    प्राकृतिक खेती को जनआंदोलन बनाने की अपेक्षा व्यक्त

    वैश्विक जलवायु के गंभीर संकट को ध्यान में रखते हुए राज्य के कृषि विश्वविद्यालयों को पारंपरिक देशी बीजों का संस्कार कर उनका उन्नयन करना चाहिए। प्रतिकूल परिस्थितियों में भी किसानों को आय सुनिश्चित हो सके, ऐसे बीज विकसित किए जाएं। साथ ही, राज्य में प्राकृतिक खेती की क्रांति लाने के लिए विश्वविद्यालयों को योगदान देना चाहिए, ऐसा आह्वान महाराष्ट्र के राज्यपाल तथा राज्य के विश्वविद्यालयों के कुलाधिपति आचार्य देवव्रत ने आज यहां किया।

    लोकभवन, मुंबई से कृषि विभाग के वरिष्ठ अधिकारियों तथा राज्य के कृषि एवं पशु विज्ञान विश्वविद्यालयों के कुलपतियों के साथ गुरुवार (1 तारीख) को ऑडियो-विजुअल माध्यम से संवाद करते हुए राज्यपाल बोल रहे थे।

    बैठक में कृषि विभाग के अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, ‘पोकरा’ परियोजना के परियोजना संचालक परिमल सिंह, राज्य के कृषि एवं पशु विज्ञान विश्वविद्यालयों के कुलपति, राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ‘आत्मा’ के संचालक सुनील बोरकर तथा कृषि विभाग के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।

    संकर बीज किसानों के लिए संकट बन गए हैं और वे महंगे भी हैं। इनके उपयोग से रासायनिक उर्वरकों की खपत भी बढ़ती है। ऐसे बीजों से उत्पादित अनाज में स्वाद नहीं होता तथा उसका पोषण मूल्य भी कम होता है। इसलिए विश्वविद्यालयों को पारंपरिक बीजों पर शोध कर उनका उन्नयन करना चाहिए, ऐसा राज्यपाल ने कहा।

    सभी कृषि विज्ञान केंद्रों को प्राकृतिक खेती के प्रचार-प्रसार के लिए ‘मॉडल फार्म’ विकसित करने चाहिए तथा किसानों के प्रशिक्षण की व्यवस्था करनी चाहिए, ऐसा भी राज्यपाल ने निर्देश दिया। प्राकृतिक खेती को जनआंदोलन बनना चाहिए, ऐसी अपेक्षा उन्होंने व्यक्त की।

    प्राकृतिक खेती एक पवित्र, ईश्वरीय कार्य है। भावी पीढ़ियों की खाद्य सुरक्षा सुनिश्चित करने के लिए यदि भूमि की उर्वरता और गुणवत्ता सुधारनी है, तो प्राकृतिक खेती के अलावा कोई विकल्प नहीं है।

    अक्सर किसान सीधे दुकानदारों के पास जाकर उनके बताए अनुसार यूरिया, डीएपी और कीटनाशक खरीदकर खेतों में उपयोग करते हैं, जिससे खेती को भारी नुकसान हो रहा है। इस दृष्टि से विश्वविद्यालयों को किसानों का प्रबोधन करना चाहिए, ऐसा भी राज्यपाल ने कहा।

    महाराष्ट्र में प्राकृतिक खेती विषय पर आयोजित दो परिसंवादों के बाद कृषि विभाग और विश्वविद्यालयों द्वारा इस दिशा में सकारात्मक रूप से कार्य आरंभ किए जाने पर राज्यपाल ने संतोष व्यक्त किया।

    गुजरात के चार कृषि विश्वविद्यालय पिछले तीन वर्षों से प्राकृतिक खेती पर शोध कर रहे हैं। इसलिए राज्य के विश्वविद्यालयों को इस विषय पर नया शोध शुरू करने के बजाय गुजरात में हुए शोध को आगे बढ़ाना चाहिए। उन्होंने बताया कि गुजरात में तैयार की गई शोध पत्रिकाएं और पुस्तकें राज्य के विश्वविद्यालयों को उपलब्ध कराई जाएंगी।

    राज्यपाल ने बताया कि वे हाल ही में गांव-गांव जाकर लोगों में प्राकृतिक खेती के प्रति जनजागृति कर रहे हैं। ऐसी ही एक यात्रा के दौरान आनंद जिले के 25 गांवों में भूजल स्रोतों में नाइट्रेट पाए जाने से पानी पीने योग्य नहीं रहा, यह तथ्य सामने आया। दूषित पानी के कारण लोगों को गंभीर बीमारियां हो रही हैं। इसलिए रसायनों के उपयोग के प्रति जागरूकता अत्यंत आवश्यक है, ऐसा उन्होंने कहा।

    राज्यपाल ने कहा कि किसानों को यह समझाना होगा कि केवल एक गाय होने पर भी प्राकृतिक खेती संभव है।

    उन्होंने यह भी कहा कि महाराष्ट्र में साहिवाल, थारपारकर, कांकरेजऔर गिर जैसी देशी गायों का संरक्षण किया जाए तो यह खेती के लिए वरदान सिद्ध होगा और किसानों की आय में वृद्धि होगी।

    इस अवसर पर ‘आत्मा’ के संचालक सुनील बोरकर ने प्रस्तुतीकरण किया।