बंद

    26.01.2024 : ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मा.राज्यपाल महोदयांचे भाषण

    प्रकाशित तारीख: January 26, 2024

    ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मा.राज्यपाल महोदयांचे भाषण 26 जानेवारी 2024

    Ø देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.

    Ø छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसह स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना तसेच समाजसुधारकांना मी विनम्र अभिवादन करतो.

    Ø महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात विकासाची कास धरली आहे. माननीय पंतप्रधानांनी नुकतेच नवी मुंबई येथे देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी पूल असलेल्या ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 35 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या विकास प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले.

    Ø दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींहून अधिक विक्रमी सामंजस्य करार केले आहेत.

    Ø माझ्या शासनाने बळीराजाच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या 45.35 लाख शेतकऱ्यांना 2100 कोटी रुपयांहून अधिक भरपाई अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनही आपले अनुदान देत असून “नमो शेतकरी महासन्मान निधी” या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी एकूण 12,000/- रु. प्राप्त होणार आहे.

    Ø शासनाने दूध उत्पादक शेतक-यांचे आर्थिक हित जपण्यासाठी दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर 5 रुपये अनुदान जाहीर केले आहे.

    Ø पूर प्रतिबंधासाठी नद्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे. 68 जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामुळे 13.35 लक्ष हे सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सुमारे 5,700 गावांत जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येत आहे.

    Ø माझ्या शासनाने ग्रामीण गृहनिर्माण योजना गतीमान करण्यासाठी ‘महाआवास आभियान’ सुरू केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात राज्यात 6.31 लाख स्वयं -सहायता गट निर्माण करण्यात आले आहेत.

    Ø रोहयो अंतर्गत 32.50 लाख मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

    Ø ‘हर घर जल’ अंतर्गत जवळपास 83.03% कुटुंबांना घरगुती नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

    Ø राज्यातील शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान सुरु करण्यात आले आहे.

    Ø राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठे नॅक मूल्यांकन व मानांकन प्रक्रियेत अग्रेसर आहेत. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    Ø पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यात ‘आई’ महिला पर्यटन धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली.

    Ø भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. दीक्षाभूमी येथील विकासकामांसाठी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

    Ø इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. आगामी तीन वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

    Ø इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी 72 शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    Ø राज्यातील 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली आहे.

    Ø पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी, गुढीपाडवा यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधा संच व ‘आनंदाचा शिधा’ यांचे वाटप करण्यात येणार आहे.

    Ø मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणासठी ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्यात असून मुलगी 18 वर्षांची झाल्यावर शासनामार्फत 75 हजार रुपये मिळणार आहे.

    Ø स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सावानिमित्त ७५ वर्ष पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत करण्यात आला आहे, तर महिलांना प्रवासात सरसकट ५० टक्के सूट देण्यात आली आहे.

    Ø मराठा आरक्षणाबाबत मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात मे 2023 मध्ये उपचारात्मक याचिका (Curative Petition) दाखल केली. शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

    Ø मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याची टप्पा २ ची कार्यवाही सुरू आहे. असुरक्षित सागरी तळावर सीसीटीव्ही व नवीन बोटी खरेदी करण्याची कार्यवाही सुरु आहे.

    Ø महाराष्ट्रात 95 हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या माध्यमातून 55 हजार रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर व दिघी येथे 5 लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येत आहे.

    Ø मुंबई कोस्टल रोडचे काम प्रगतीपथावर आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

    Ø प्रधानमंत्री आवास योजना राज्यात 409 शहरात लागू करण्यात आली आहे. धारावीचा एकात्मिक विकास करण्यासाठी विशेष हेतू कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

    Ø माझ्या शासनाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील क्षमतावाढ प्रकल्पाचे (मिसिंग लिंक) काम हाती घेतले आहे. ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग, विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका प्रकल्प, प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन प्रकल्पांची कामे देखील प्रगतीपथावर आहेत.

    Ø मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गरजू नागरिकांना 180 कोटी 45 लाख रुपयांपेक्षा जास्त मदत करण्यात आली आहे. सीमा भागातील गावांत मराठी भाषिकांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यात आले आहेत.

    Ø राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण माझ्या शासनाने आखले आहे.

    Ø महाराष्ट्र बांबू विकास मंडळांतर्गत बांबू क्लस्टरची निर्मिती करण्यात आली आहे.

    Ø जिल्हा व अधिनस्त न्यायालयातील न्यायिक अधिका-यांची पदे निर्माण करण्यास तसेच विशेष जलदगती न्यायालयांकरिता पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    Ø रायगड येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

    Ø ‘शासन आपल्या दारी’ अभियानात सुमारे 2 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळाला.

    Ø माझे शासन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध आहे.

    Ø स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा असे आवाहन करतो आणि सर्वांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देतो.

    जय हिंद जय महाराष्ट्र…

    **************** ************

    75 वें गणतंत्र दिवस के अवसर पर मा. राज्यपाल महोदय का भाषण 26 जनवरी 2024

    Ø देश के 75 वें गणतंत्र दिवस के अवसर पर राज्य की जनता को बहुत बहुत बधाई…..

    Ø छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपति शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समेत आजादी की लड़ाई के सभी क्रांतिवीरों एवं समाजसुधारकों को मैं विनम्र अभिवादन करता हूँ।

    Ø महाराष्ट्र सभी क्षेत्रों में विकास की ओर बढ़ रहा है. माननीय प्रधानमंत्री ने हाल ही में नवी मुंबई में देश के सबसे लंबे समुद्री पुल ‘अटल सेतु’ का उद्घाटन किया। इस दौरान उन्होंने 35 हजार करोड़ रुपये से अधिक निवेश की विकास परियोजनाओं का भी उद्घाटन किया है।

    Ø दावोस में आयोजित विश्व आर्थिक परिषद में महाराष्ट्र ने 3 लाख 53 हजार 675 लाख करोड़ से अधिक सामंजस्य करार किये है।

    Ø मेरी सरकार ने हमेशा से ही किसानों के हित को प्राथमिकता दी है। खरीफ हंगाम 2023 में विपरीत परिस्थितियों के कारण संकट में आये 45.35 लाख किसानों को 2100 करोड़ रूपये से अधिक के मुआवजे अदा किये है। प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना के तहत राज्य सरकार भी अपना अनुदान दे रहा है, इस तरह से “नमो किसान महा सम्मान निधि” योजना के तहत पात्र किसान परिवारों को प्रति वर्ष कुल 12,000 रुपये मिलेंगे।

    Ø सरकार ने दूध उत्पादक किसानों के वित्तीय हितों की रक्षा के लिए दूध उत्पादक किसानों को प्रति लीटर 5 रुपये अनुदान की घोषणा की है।

    Ø बाढ़ की रोकथाम के लिए नदियों से गाद निकाली जाएगी। 68 जल संसाधन परियोजनाओं को सुधारित प्रशासनिक मंजूरी दी गई। जिससे 13.35 लाख इतनी सिंचाई क्षमता सृजित होगी। लगभग 5,700 गांवों में जलयुक्त शिवार अभियान 2.0 चलाया जा रहा है।

    Ø मेरी सरकार ने ग्रामीण आवास योजनाओं में तेजी लाने के लिए ‘महाआवास अभियान’ शुरू किया है. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान के तहत राज्य में 6.31 लाख स्वयं सहायता समूहों का निर्माण किया गया है।

    Ø रोजगार हमी योजना (रोहयो) के तहत 32.50 लाख मजदूरों को रोजगार उपलब्ध कराया है।

    Ø ‘हर घर जल’ के तहत लगभग 83.03 फीसदी परिवारों को घरेलू नल के द्वारा जल आपूर्ति शुरू की गई है।

    Ø राज्य के स्कूलों में ‘मुख्यमंत्री-मेरा विद्यालय सुंदर विद्यालय’ यह स्पर्धात्मक अभियान शुरू किया गया है।

    Ø राज्य में नई राष्ट्रीय शिक्षा नीति का प्रभावी क्रियान्वयन किया जा रहा है। राज्य के महाविद्यालय और विश्वविद्यालय नैक मूल्यांकन और मानांकन प्रक्रिया में अग्रसर हैं। अमरावती जिले के रिद्धपुर में मराठी भाषा विश्वविद्यालय स्थापित करने का निर्णय भी लिया गया है।

    Ø पर्यटन को बढ़ावा देने के लिए राज्य में ‘आई’ महिला पर्यटन नीति लागू की गई है।

    Ø इंदु मिल में भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर का अंतरराष्ट्रीय स्तर के स्मारक का कार्य प्रगतिपथ पर है। दीक्षाभूमि के विकासकार्यों के लिए 200 करोड़ रुपये मंजूर किये गये हैं।

    Ø अन्य पिछड़ा वर्ग और विशेष पिछड़ा वर्ग के लिए मोदी आवास घरकुल योजना लागू करने को मंजूरी दी गई है। अगले तीन वर्षों में 10 लाख घरों के निर्माण के लिए 12 हजार करोड़ रुपये उपलब्ध कराये जाएंगे।

    Ø अन्य पिछड़ा वर्ग, विमुक्त जाति, घुमंतू (भटक्या) जनजाति और विशेष पिछड़ा वर्ग के छात्रों के लिए 36 जिलों में 72 सरकारी छात्रावास शुरू करने को मंजूरी दी गई है।

    Ø राज्य की 250 सरकारी आदिवासी आश्रमशालाओं को ‘आदर्श शाला’ के रूप में विकसित करने की योजना को स्वीकृति दी गई है।

    Ø पात्र राशनकार्डधारकों को दिवाली, गुढीपड़वा सहित डॉ. बाबासाहेब आंबेडक जयंती, श्री राम प्राण प्रतिष्ठा समारोह और छत्रपति शिवाजी महाराज जयंती के अवसर पर शिधा संच और ‘आनंदचा शिधा’ का वितरण किया जाएगा।

    Ø लड़कियों के आर्थिक सशक्तिकरण के लिए ‘लेक लड़की योजना’ शुरू की है और लड़की 18 वर्ष की होने के बाद उसे सरकार की ओर से 75 हजार रुपये दिए जाएंगे।

    Ø आजादी के अमृत महोत्सव के औचित्य पर 75 साल पुरे हो चुके वरिष्ठ नागरिकों को एसटी की यात्रा मुफ्त की है, वहीँ महिलाओं को यात्रा में 50 फीसदी छूट दी गई है।

    Ø मराठा आरक्षण के संबंध में मा. न्यायमूर्ति संदीप शिंदे (सेवानिवृत्त) की अध्यक्षता में समिति गठित की गई है। राज्य सरकार ने सुप्रीम कोर्ट में मई 2023 में क्यूरेटिव पिटीशन दायर की है। सरकार का पक्ष प्रभावी रूप से रखने के लिए वरिष्ठ वकीलों के टास्क फोर्स का गठन भी किया गया है।

    Ø मुंबई में सीसीटीवी लगाने के दूसरे चरण की कार्यवाही जारी है। असुरक्षित समुद्री तटों पर सीसीटीवी और नई नावों की खरीदी की कार्यवाही भी जारी है।

    Ø महाराष्ट्र में 95 हजार करोड़ रुपये के औद्योगिक निवेश आकर्षित करने का लक्ष्य है। उस माध्यम से 55 हजार रोजगार का निर्माण होगा। मुंबई, नासिक, पुणे, छत्रपति संभाजीनगर और दिघी में 5 लॉजिस्टिक पार्क स्थापित किए जा रहे हैं।

    Ø मुंबई कोस्टल रोड का कार्य प्रगतिपथ पर है। हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक का काम भी युद्ध स्तर पर चल रहा है।

    Ø राज्य के 409 शहरों में प्रधानमंत्री आवास योजना लागू की गई है। धारावी के एकीकृत विकास के लिए एक विशेष प्रयोजन कंपनी का गठन किया गया है।

    Ø मेरी सरकार ने मुंबई-पुणे एक्सप्रेसवे की क्षमता वृद्धि परियोजना (मिसिंग लिंक) शुरू की है। ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवे, विरार से अलीबाग बहुउद्देश्यीय कॉरिडोर परियोजना, प्राचीन मंदिरों के संरक्षण और संवर्धन की परियोजनाओं के काम भी प्रगतिपथ पर है।

    Ø मुख्यमंत्री चिकित्सा सहायता प्रकोष्ठ के माध्यम से जरूरतमंद नागरिकों को 180 करोड़ 45 लाख रुपये से अधिक की मदद की गई है। सीमावर्ती गांवों में मराठी भाषियों के लिए महात्मा ज्योतिराव फुले जन स्वास्थ्य योजना लागू की है। राज्य में 700 स्थानों पर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ स्थापित किया गया हैं।

    Ø मेरी सरकार ने राज्य के प्रत्येक जिले में सरकारी मेडिकल कॉलेज शुरू करने की नीति बनाई है।

    Ø महाराष्ट्र बांस विकास बोर्ड के तहत बांस क्लस्टर का निर्माण भी किया गया है।

    Ø जिला और अधीनस्थ न्यायालयों में न्यायिक अधिकारियों के पदों के सृजन के साथ-साथ विशेष फास्ट ट्रैक न्यायालयों के लिए पदों के सृजन को भी मंजूरी दी गई है।

    Ø रायगढ़ में शिवराज्यभिषेक दिवस के 350वें वर्ष के उपलक्ष्य में एक भव्य समारोह का आयोजन किया गया।

    Ø ‘सरकार आपके द्वार’ (‘शासन आपल्या दारी’) अभियान में 2 करोड़ से अधिक लाभार्थियों को लाभ मिला है।

    Ø मेरी सरकार सभी समाजवर्गों को साथ लेकर एक समावेशी, प्रगतिशील और विकसित महाराष्ट्र के निर्माण के लिए प्रतिबद्ध है।

    Ø स्वतंत्रता के अमृत काल में, एक नए और सशक्त महाराष्ट्र के निर्माण का संकल्प करें, यह आवाहन करता हूँ। पुनश्च आप सभी को गणतंत्र दिवस की बहुत बहुत शुभकामनाएँ।

    जय हिंद। जय महाराष्ट्र।।