बंद

    21.06.2026: आंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यास

    प्रकाशित तारीख : June 21, 2026
    Governor joined the senior officers of Indian Coast Guard in performing yoga in Lok Bhavan

    आंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यास

    विद्यापीठांनी जगासाठी योग प्रशिक्षक घडवावे, राज्यपालांचे आवाहन

    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योगसत्रात सहभाग घेतला. यावर्षी लोकभवनातील योग दिवस भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. भारतीय तटरक्षक दल यंदा स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.

    योगसत्राला तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसेच महाराष्ट्र लोकभवनातील अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार – प्रसार करण्याचे तसेच जगासाठी उत्तम योग शिक्षक व प्रशिक्षक घडवण्याचे आवाहन केले.

    आज योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे असे नमूद करून राज्यपाल म्हणाले की, शतकानुशतके योगाचा अभ्यास केवळ घरांमध्ये, आश्रम आणि योग संस्थांमध्ये केला जात असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचे आवाहन केल्यानंतर आज जगातील १५० हून अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

    सन १९७७ झालेल्या स्थापनेपासून राष्ट्रसेवेत कार्यरत असलेल्या व यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या योगदानाचे राज्यपालांनी कौतुक केले.

    “असंख्य यशस्वी मोहिमा आणि दक्षतेमुळे भारतीय तटरक्षक दल भारताच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनले आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, गजबजलेली बंदरे आणि महत्त्वपूर्ण सागरी हितसंबंध असलेल्या महाराष्ट्राला तटरक्षक दलाच्या कार्याचा मोठा लाभ झाला आहे. समुद्रातील जीविताचे संरक्षण, मच्छीमार आणि नाविकांची सुरक्षा, बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध आणि किनारपट्टीवरील सुरक्षेची जबाबदारी तटरक्षक दलाने प्रभावीपणे पार पाडली आहे,” असे राज्यपालांनी सांगितले.

    तटरक्षक दलाचे अधिकारी आणि जवान कठीण परिस्थितीतही अथक परिश्रम करून भारताचे समुद्र सुरक्षित, संरक्षित आणि समृद्ध ठेवत असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

    आपण राज्यातील २९ विद्यापीठांचे कुलपती आहोत याचा उल्लेख करुन राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावे व योग या भारताच्या अमूल्य परंपरेचा जागतिक प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

    यावेळी भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे अतिरिक्त महासंचालक एम. व्ही. पाठक, पीटीएम, टीएम तसेच महानिरीक्षक भीष्म शर्मा, पीटीएम, टीएम यांनी राज्यपालांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कैवल्यधामचे योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया यांनी योग व प्राणायाम सत्राचे मार्गदर्शन केले.

    **

    अंतरराष्ट्रीय योग दिवस : राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने भारतीय तटरक्षक बल के अधिकारियों के साथ किया योगाभ्यास

    विश्व के लिए योग प्रशिक्षक तैयार करें विश्वविद्यालय : राज्यपाल का आह्वान

    अंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज मुंबई स्थित महाराष्ट्र लोकभवन में भारतीय तटरक्षक बल (इंडियन कोस्ट गार्ड) के अधिकारियों के साथ योग सत्र में भाग लिया। इस वर्ष लोकभवन में अंतरराष्ट्रीय योग दिवस का आयोजन भारतीय तटरक्षक बल के सहयोग से किया गया। भारतीय तटरक्षक बल इस वर्ष अपनी स्थापना के स्वर्ण जयंती वर्ष में प्रवेश कर रहा है।

    योग सत्र में तटरक्षक बल के अधिकारी, उनके परिवारजन तथा महाराष्ट्र लोकभवन के अधिकारी उपस्थित थे।

    इस अवसर पर उपस्थित जनसमूह को संबोधित करते हुए राज्यपाल ने राज्य के सार्वजनिक विश्वविद्यालयों से योग के व्यापक प्रचार-प्रसार तथा विश्व के लिए उत्कृष्ट योग शिक्षक एवं प्रशिक्षक तैयार करने का आह्वान किया।

    राज्यपाल ने कहा कि आज योग को वैश्विक स्तर पर अभूतपूर्व मान्यता प्राप्त हुई है। उन्होंने कहा कि सदियों तक योग का अभ्यास मुख्यतः घरों, आश्रमों और योग संस्थानों तक सीमित था। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा संयुक्त राष्ट्र में 21 जून को अंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित किए जाने का प्रस्ताव रखने के बाद योग को विश्वव्यापी पहचान मिली। आज 150 से अधिक देशों में अंतरराष्ट्रीय योग दिवस मनाया जाता है, जो प्रत्येक भारतीय के लिए गर्व का विषय है।

    राज्यपाल ने वर्ष 1977 में स्थापित भारतीय तटरक्षक बल की राष्ट्रसेवा में दी गई महत्वपूर्ण भूमिका की सराहना की। उन्होंने कहा कि स्वर्ण जयंती वर्ष में प्रवेश कर रहा यह बल समर्पण, व्यावसायिक दक्षता और निःस्वार्थ सेवा का उत्कृष्ट उदाहरण है।

    राज्यपाल ने कहा, “असंख्य सफल अभियानों और निरंतर सतर्कता के कारण भारतीय तटरक्षक बल भारत की समुद्री सुरक्षा व्यवस्था का एक महत्वपूर्ण स्तंभ बन गया है। विस्तृत समुद्री तट, व्यस्त बंदरगाहों और महत्वपूर्ण समुद्री हितों वाले महाराष्ट्र को तटरक्षक बल की सेवाओं से अत्यधिक लाभ हुआ है। समुद्र में मानव जीवन की रक्षा, मछुआरों और नाविकों की सुरक्षा, अवैध गतिविधियों की रोकथाम तथा तटीय सुरक्षा सुनिश्चित करने में तटरक्षक बल ने महत्वपूर्ण भूमिका निभाई है।”

    उन्होंने कहा कि तटरक्षक बल के अधिकारी और जवान कठिन परिस्थितियों में भी अथक परिश्रम कर देश के समुद्री क्षेत्र को सुरक्षित, संरक्षित और समृद्ध बनाए रखने में योगदान दे रहे हैं।

    राज्यपाल ने यह भी उल्लेख किया कि वे राज्य के 29 विश्वविद्यालयों के कुलाधिपति हैं। उन्होंने विश्वविद्यालयों से आग्रह किया कि वे श्रेष्ठ योग शिक्षक और प्रशिक्षक तैयार करें तथा भारत की इस अमूल्य परंपरा के वैश्विक प्रसार में अग्रणी भूमिका निभाएँ।

    इस अवसर पर भारतीय तटरक्षक बल के पश्चिमी समुद्री क्षेत्र के अतिरिक्त महानिदेशक एम. वी. पाठक, पीटीएम, टीएम तथा महानिरीक्षक भीष्म शर्मा, पीटीएम, टीएम ने राज्यपाल का स्मृति चिन्ह भेंट कर सम्मान किया। कैवल्यधाम के योग प्रशिक्षक दिलीप दौनेरिया ने योग एवं प्राणायाम सत्र का संचालन किया।

    **