बंद

    16.04.2026: राज्यपालांच्या पुढाकाराने लोक भवन नागपूर येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

    प्रकाशित तारीख : April 17, 2026
    Governor inaugurates Solar Energy Project at Lok Bhavan, Nagpur

    राज्यपालांच्या पुढाकाराने लोक भवन नागपूर येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

    पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. १६) लोकभवन, नागपूर येथे अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. प्रकल्पाची क्षमता ९० किलोवॅट असून त्यातून दरवर्षी सुमारे १,१५,२०० युनिट्स स्वच्छ वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे.

    “हरित ऊर्जा हीच भविष्याची गरज” – राज्यपाल

    सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करताना राज्यपालांनी हरित ऊर्जा हीच भविष्याची गरज असून अशा प्रकल्पांमुळे केवळ पर्यावरणाचे संरक्षण होत नाही, तर ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठीही मोठी मदत होते, असे सांगितले.

    नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात अशा प्रकल्पांमुळे इतर संस्था आणि नागरिकांनाही नवीकरणीय ऊर्जेकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    या प्रकल्पामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होणार आहे. तसेच वीज बिलात बचत होऊन दीर्घकालीन आर्थिक फायदा होणार आहे.

    प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवले यांचेसह मेडाच्या अधिकाऱ्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाच्या अभियंत्यांनी केली.

    या कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे खासगी सचिव पवन सिंह, राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवले, विभागीय महाव्यवस्थापक (महाऊर्जा) सारंग महाजन तसेच अभियंते अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    वैशिष्ट्ये
    अत्याधुनिक तंत्रज्ञान: SolarEdge (DC Power Optimizer) तंत्रज्ञानाचा वापर, ज्यामुळे प्रत्येक सोलर पॅनेलचे स्वतंत्र निरीक्षण शक्य

    वाढीव कार्यक्षमता: सावली, धूळ किंवा एखाद्या पॅनेलमध्ये बिघाड झाला तरी संपूर्ण प्रणालीवर परिणाम होत नाही

    रिअल-टाइम मॉनिटरिंग: वीज निर्मितीची प्रत्यक्ष वेळेत पाहणी करण्याची सुविधा
    **

    राज्यपाल के पहल पर राजभवन नागपुर में सौर ऊर्जा परियोजना का उद्घाटन

    पर्यावरण संरक्षण और ऊर्जा आत्मनिर्भरता की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाते हुए महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने गुरुवार (16 अप्रैल) को लोकभवन, नागपुर में अत्याधुनिक सौर ऊर्जा परियोजना का उद्घाटन किया। इस परियोजना की क्षमता 90 किलोवाट है और इससे प्रतिवर्ष लगभग 1,15,200 यूनिट स्वच्छ बिजली उत्पादन होने की अपेक्षा है।

    “हरित ऊर्जा ही भविष्य की आवश्यकता” – राज्यपाल

    सौर ऊर्जा के महत्व पर प्रकाश डालते हुए राज्यपाल ने कहा कि हरित ऊर्जा ही भविष्य की आवश्यकता है। उन्होंने कहा कि ऐसे प्रकल्प न केवल पर्यावरण संरक्षण में सहायक हैं, बल्कि ऊर्जा क्षेत्र में आत्मनिर्भरता प्राप्त करने में भी महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं।

    उन्होंने विश्वास व्यक्त किया कि नागपुर जैसे महत्वपूर्ण शहर में इस प्रकार की परियोजनाएं अन्य संस्थानों और नागरिकों को भी नवीकरणीय ऊर्जा अपनाने के लिए प्रेरित करेंगी।

    इस परियोजना के माध्यम से पारंपरिक ऊर्जा स्रोतों पर निर्भरता कम होगी तथा कार्बन उत्सर्जन में उल्लेखनीय कमी आएगी। साथ ही, बिजली के बिल में कमी के कारण दीर्घकालीन आर्थिक लाभ भी प्राप्त होगा।

    इस परियोजना का कार्यान्वयन राज्यपाल के अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवले के साथ मेडा (MEDA) के अधिकारियों तथा सार्वजनिक निर्माण (विद्युत) विभाग के अभियंताओं द्वारा किया गया।

    इस अवसर पर राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपाल के परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपाल के निजी सचिव श्री पवन सिंह, अतिरिक्त परिवार प्रबंधक श्री रमेश येवले, विभागीय महाप्रबंधक (महाऊर्जा) श्री सारंग महाजन तथा अन्य अभियंता, अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित थे।

    परियोजना की विशेषताएं
    • अत्याधुनिक तकनीक: SolarEdge (DC Power Optimizer) तकनीक का उपयोग, जिससे प्रत्येक सोलर पैनल की स्वतंत्र निगरानी संभव है।
    • उच्च दक्षता: छाया, धूल या किसी एक पैनल में खराबी आने पर भी पूरी प्रणाली प्रभावित नहीं होती।
    • रियल-टाइम मॉनिटरिंग: बिजली उत्पादन की वास्तविक समय में निगरानी की सुविधा उपलब्ध है।