बंद

    10.07.2026: महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    प्रकाशित तारीख : July 11, 2026
    10.07.2026:'फॉर्च्युन इंडिया' मासिकातर्फे देण्यात येणार्या 'फॉर्च्युन इंडिया १०० मोस्ट पॉवरफुल वूमेन' पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल फोर सीझन्स मुंबई येथे झाली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'फॉर्च्युन इंडिया' मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.  उदघाटन सत्राला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, आरपी संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका, फॉर्च्युन इंडिया समूहाचे मुख्य संपादक सौरव मुजुमदार आदी उपस्थित होते. यावेळी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉर्पोरेट लॉ फर्म एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह संस्थापिका झिया मोदी, नीरजा बिर्ला यांसह उद्योग, व्यवसाय, बँकिंग क्षेत्रातील प्रभावी महिला उपस्थित होत्या.

    ‘१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान’

    नीता अंबानी, स्मृती इराणी, झिया मोदी, नीरजा बिर्ला यांची उपस्थिती

    महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गावोगावींच्या महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत आहेत. हे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.

    ‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या ‘फॉर्च्युन इंडिया १०० मोस्ट पॉवरफुल वूमेन (सर्वाधिक प्रभावी महिला)’ पुरस्काराचा आरंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. १० जुलै) मुंबई येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

    विविध क्षेत्रात नेतृत्वस्थानी असलेल्या महिलांना संबोधित करताना, राज्यपाल म्हणाले की, महिला स्वयंसहायता गटांमुळे स्वतःच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून इतरांना देखील प्रोत्साहन देणाऱ्या महिला अनेक ठिकाणी उदयास आल्या आहेत.

    पूर्वी बँकेत जाण्यास देखील घाबरणाऱ्या त्रिपुरा येथील एका ग्रामीण महिलेने कालांतराने स्वतः अधिकाऱ्यांसमोर आत्मविश्वासाने पॉवर पॉईंट सादरीकरण केले त्यावेळी सर्व उपस्थित आश्चर्यचकित झाले होते. ती महिला ‘बँक सखी’ म्हणून आज अनेक महिलांना मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांकडील अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. महिलांकडे गेलेला पैसे सुरक्षित असतो असे त्यांनी सांगितले.

    देशातील ५० टक्के नागरिक महिला असल्यामुळे त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून ‘विकसित भारता’चे लक्ष्य साध्य करता येणार नाही. त्यामुळे समाजातील शेवटच्या स्तरावरील महिलेपर्यंत पोहोचून तिचे सक्षमीकरण झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

    महिला केवळ परिवर्तनाच्या अग्रस्थानी : अनुप्रिया पटेल

    आज महिला तळागाळापासून तर उद्योग जगतातील मोठमोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. विकास प्रक्रियेत त्या केवळ सहभागी होत नसून परिवर्तनाच्या अग्रस्थानी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावेळी केले.

    यावेळी त्यांनी उपस्थितांना केंद्र शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याची माहिती दिली. मातेचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच माता मृत्युदर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आल्याचे सांगून त्यांनी ‘नारीशक्ती वंदन’ अधिनियम व ‘पोषण अभियान’ उपक्रमाची माहिती दिली.

    गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी केंद्र शासनातर्फे एचपीव्ही लस देण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी ‘आयुष्मान भारत’ योजना, ‘जनऔषधी औषधालये, लखपती दीदी, नमो ड्रोन आदी योजनांची माहिती दिली.

    सुरुवातीला राज्यपालांच्या हस्ते ‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकाच्या ताज्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. आरपी संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका यांनी प्रास्ताविक केले तर ‘फॉर्च्युन इंडिया’चे मुख्य संपादक सौरव मुजुमदार यांनी आभारप्रदर्शन केले.

    उदघाटन सत्राला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉर्पोरेट लॉ फर्म एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह संस्थापिका झिया मोदी, नीरजा बिर्ला यांसह उद्योग, व्यवसाय, बँकिंग क्षेत्रातील प्रभावी महिला उपस्थित होत्या.

    **

    ‘फॉर्च्यून इंडिया 100 मोस्ट पावरफुल वुमेन’ सम्मान समारोह

    महिला स्वयं सहायता समूहों ने देश में क्रांति लाई है : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    नीता अंबानी, स्मृति ईरानी, जिया मोदी और नीरजा बिड़ला की उपस्थिति

    महिला स्वयं सहायता समूहों ने देश में महिलाओं के सामाजिक, आर्थिक और राजनीतिक सशक्तीकरण को नई गति प्रदान की है तथा ग्रामीण और आदिवासी महिलाओं के जीवन में क्रांतिकारी परिवर्तन लाए हैं। गांव-गांव की महिलाओं में नेतृत्व क्षमता विकसित हो रही है। यह कार्य और अधिक प्रभावी बनाने के लिए समाज के अंतिम व्यक्ति तक पहुँचना आवश्यक है। यह बात महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने आज यहाँ कही।

    ‘फॉर्च्यून इंडिया 100 मोस्ट पावरफुल वुमेन’ सम्मान समारोह का शुभारंभ शुक्रवार (10 जुलाई) को मुंबई में राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा की प्रमुख उपस्थिति में हुआ। इस अवसर पर वे उपस्थित जनसमूह को संबोधित कर रहे थे।

    कार्यक्रम में केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल भी उपस्थित थीं। इस अवसर पर राज्यपाल ने ‘फॉर्च्यून इंडिया’ पत्रिका के नवीनतम अंक का विमोचन किया।

    विभिन्न क्षेत्रों में नेतृत्व कर रही महिलाओं को संबोधित करते हुए राज्यपाल ने कहा कि स्वयं सहायता समूहों के माध्यम से अनेक महिलाओं ने अपने जीवन में सकारात्मक परिवर्तन लाया है तथा वे अन्य महिलाओं के लिए भी प्रेरणा का स्रोत बनी हैं।

    उन्होंने त्रिपुरा की एक ग्रामीण महिला का उदाहरण देते हुए कहा कि जो महिला कभी बैंक जाने से भी हिचकिचाती थी, वही बाद में अधिकारियों के समक्ष पूरे आत्मविश्वास के साथ पावर-पॉइंट प्रस्तुति देने लगी। आज वह ‘बैंक सखी’ के रूप में अनेक महिलाओं को वित्तीय सेवाओं से जोड़ने का कार्य कर रही है। उन्होंने कहा कि महिलाओं को दिए गए ऋणों में अनुत्पादक परिसंपत्तियों (एनपीए) का प्रतिशत एक प्रतिशत से भी कम है। महिलाओं के हाथों में दिया गया धन सुरक्षित रहता है।

    राज्यपाल ने कहा कि देश की लगभग 50 प्रतिशत आबादी महिलाएँ हैं। उनके विकास की उपेक्षा करके ‘विकसित भारत’ का लक्ष्य प्राप्त नहीं किया जा सकता। इसलिए समाज के अंतिम पायदान पर खड़ी महिला तक पहुँचकर उसका सशक्तीकरण सुनिश्चित करना समय की आवश्यकता है।

    महिलाएँ केवल सहभागी नहीं, परिवर्तन की अग्रदूत हैं : अनुप्रिया पटेल

    इस अवसर पर केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल ने कहा कि आज महिलाएँ जमीनी स्तर से लेकर उद्योग जगत की सर्वोच्च जिम्मेदारियाँ सफलतापूर्वक निभा रही हैं। वे विकास प्रक्रिया में केवल भागीदार ही नहीं, बल्कि परिवर्तन का नेतृत्व भी कर रही हैं।

    उन्होंने केंद्र सरकार द्वारा महिला सशक्तीकरण के लिए किए जा रहे विभिन्न प्रयासों की जानकारी देते हुए कहा कि मातृ स्वास्थ्य में सुधार तथा मातृ मृत्यु दर में कमी लाने के लिए भारत के प्रयासों को वैश्विक स्तर पर सराहना मिली है। उन्होंने ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ तथा ‘पोषण अभियान’ जैसी महत्वपूर्ण पहलों का उल्लेख किया।

    उन्होंने बताया कि महिलाओं को गर्भाशय ग्रीवा (सर्वाइकल) कैंसर से बचाने के लिए केंद्र सरकार द्वारा एचपीवी वैक्सीन उपलब्ध कराई जा रही है। इसके साथ ही उन्होंने आयुष्मान भारत, जन औषधि केंद्र, लखपति दीदी तथा नमो ड्रोन जैसी योजनाओं की भी जानकारी दी।

    कार्यक्रम की शुरुआत राज्यपाल द्वारा ‘फॉर्च्यून इंडिया’ पत्रिका के नवीनतम अंक के विमोचन से हुई। आरपी संजीव गोयनका समूह के उपाध्यक्ष शाश्वत गोयनका ने स्वागत भाषण दिया, जबकि ‘फॉर्च्यून इंडिया’ के प्रधान संपादक सौरव मजूमदार ने धन्यवाद ज्ञापित किया।

    उद्घाटन सत्र में नेशनल स्टॉक एक्सचेंज के मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान, रिलायंस फाउंडेशन की अध्यक्षा नीता अंबानी, पूर्व केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी, एज़ेडबी एंड पार्टनर्स की सह-संस्थापक जिया मोदी, नीरजा बिड़ला सहित उद्योग, व्यापार और बैंकिंग क्षेत्र की अनेक प्रतिष्ठित एवं प्रभावशाली महिलाएँ उपस्थित थीं।

    **