बंद

    09.04.2026: प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    प्रकाशित तारीख : April 9, 2026

    तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

    प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. यापैकी ४० टक्के प्लास्टिक अंतिमतः नदी, नाले व भूगर्भात जात आहे. नद्या व समुद्रात प्लास्टिक गेल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे मत्यव्यवसाय, पर्यटन व आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकला योग्य पर्याय शोधावा लागेल आणि प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.

    संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे ‘प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम’ या विषयावर आयोजित तज्ज्ञांच्या मुंबई येथे झालेल्या चर्चासत्राला राज्यपाल संबोधित करीत होते.

    स्वच्छ पाणी व स्वच्छ पर्यावरणाशिवाय विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही असे सांगून प्लास्टिक पासून पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन कॉर्पोरेट, उद्योग, नीती निर्माते या सर्वांना या कार्यात पुढाकार घ्यावा लागेल व त्यासाठी विद्यार्थी, युवक व समाजाच्या इतर सर्व घटकांमध्ये जागरुकता निर्माण करावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    शाश्वततेशिवाय झालेल्या विकासाला ‘विकास’ म्हणता येणार नाही असे सांगून राज्यपालांनी प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी शासन, उद्योग जगत आणि नागरिकांना एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

    तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजही भूगर्भात पडून आहे:

    ईश्वर सर्वव्यापी आहे, तसेच प्लास्टिकही आज सर्वव्यापी झाले असून हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या सखोल भागापर्यंत प्लास्टिक पोहोचले आहे. तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आज देखील जमिनीच्या पोटात कोठेतरी पडून आहे. त्यामुळे प्लास्टिक वस्तू व प्लास्टिक आवरणामुळे होणारे प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतातील प्रमुख बाळकृष्ण पशुपती यांनी यावेळी केले.

    रिझर्व्ह बँकेची शाश्वत वित्तपुरवठ्याची योजना असून त्यामाध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या कार्याला वित्त पुरवठ्याच्या माध्यमातून चालना दिली जात असल्याचे बँकेचे कार्यकारी अध्यक्ष आर केशवन यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वर्क इन प्रोग्रेस: रिड्युसिंग द प्लास्टिक फूटप्रिंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड पॅकेजिंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

    बैठकीला विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य शाश्वतता अधिकारी तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

    **
    आपका पहला टूथब्रश आज भी पृथ्वी पर कहीं न कहीं पड़ा हुआ है

    प्लास्टिक प्रदूषण को कम करने के लिए समाज के प्रत्येक घटक को अपना योगदान देना होगा:राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    देश में हर वर्ष लगभग 34 लाख टन प्लास्टिक कचरा उत्पन्न होता है, जिसमें से लगभग 40 प्रतिशत अंततः नदियों, नालों और भूमिगत स्तर तक पहुंच जाता है। नदियों और समुद्रों में प्लास्टिक जाने से पर्यावरण को गंभीर क्षति हो रही है। प्लास्टिक प्रदूषण के कारण मत्स्य व्यवसाय, पर्यटन और जनस्वास्थ्य पर भी खतरा उत्पन्न हो रहा है। इसलिए प्लास्टिक के उपयुक्त विकल्पों की खोज करना और इसके उपयोग को कम करना समय की आवश्यकता है, ऐसा राज्यपाल ने कहा।

    संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम द्वारा ‘प्लास्टिक उत्पादों और प्लास्टिक पैकेजिंग के पर्यावरण पर दुष्प्रभाव’ विषय पर मुंबई में आयोजित विशेषज्ञों की बैठक को संबोधित करते हुए राज्यपाल ने कहा कि स्वच्छ जल और स्वच्छ पर्यावरण के बिना विकसित भारत का लक्ष्य प्राप्त नहीं किया जा सकता। उन्होंने कहा कि प्लास्टिक से होने वाले खतरे को देखते हुए कॉर्पोरेट क्षेत्र, उद्योग, नीति-निर्माता सभी को इस दिशा में पहल करनी होगी तथा विद्यार्थियों, युवाओं और समाज के सभी वर्गों में जागरूकता उत्पन्न करनी होगी।

    “सततता के बिना विकास को विकास नहीं कहा जा सकता,” यह कहते हुए राज्यपाल ने प्लास्टिक प्रदूषण की गंभीर समस्या से निपटने के लिए सरकार, उद्योग जगत और नागरिकों को मिलकर प्रयास करने का आह्वान किया।

    इस अवसर पर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम के भारत प्रमुख बालकृष्ण पिसुपति ने कहा कि जिस प्रकार ईश्वर सर्वव्यापी है, उसी प्रकार आज प्लास्टिक भी सर्वव्यापी हो गया है—हिमालय की ऊंचाइयों से लेकर समुद्र की गहराइयों तक। उन्होंने कहा, “आपका पहला टूथब्रश आज भी जमीन के भीतर कहीं पड़ा हुआ है,” और इस बात पर जोर दिया कि प्लास्टिक उत्पादों और पैकेजिंग से होने वाले प्रदूषण को कम करना अत्यंत आवश्यक है।

    रिज़र्व बैंक के कार्यकारी निदेशक आर. केशवन ने बताया कि बैंक की सतत वित्त (सस्टेनेबल फाइनेंस) योजना के माध्यम से पर्यावरण संरक्षण को वित्तीय सहायता प्रदान की जा रही है।

    इस अवसर पर राज्यपाल के हस्ते ‘वर्क इन प्रोग्रेस : रेड्युसिंग द प्लास्टिक फूटप्रिंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड पॅकेजिंग’ रिपोर्ट का विमोचन किया गया।

    बैठक में विभिन्न कॉर्पोरेट कंपनियों के मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य स्थिरता अधिकारी तथा इस क्षेत्र के विशेषज्ञ उपस्थित थे।
    **