बंद

    02.06.2026: भगवान बुद्ध उभय देशांना जोडणारा अध्यात्मिक दुवा : राज्यपाल

    प्रकाशित तारीख : June 3, 2026
    02.06.2026:भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग व त्यांचे सोबत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी (दि. २ जून) लोकभवन, मुंबई येथे स्वागत समारोहाचे आयोजन केले. यावेळी आयोजित स्नेहभोजनाला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    आर्थिक सहकार्य, व्यापार व गुंतवणूक वाढविण्याच्या हेतूने भारत भेट : उ मिन आँग लॉन्ग

    भूकंप तसेच कोरोना काळात भारताने केलेल्या मदतीबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

    भगवान बुद्ध उभय देशांना जोडणारा अध्यात्मिक दुवा : राज्यपाल

    भारत – म्यानमार दोन्ही देशांना वसाहत बनवण्यात आले होते. मात्र, स्वातंत्र्यपूर्व, तसेच त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात देखील उभय देशांमधील संबंध कायम घनिष्ट आहेत. या संबंधांना नव्याने चालना देण्यासाठी पश्चिम भारताचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबईला भेट दिली. ही भारत भेट आर्थिक सहकार्य, व्यापार व गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने आहे असे प्रतिपादन म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग यांनी येथे केले.

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ लोकभवन येथे स्वागत समारोहाचे आयोजन केले होते, त्यापूर्वी झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष उ मिन आँग लॉन्ग बोलत होते.

    म्यानमार – भारत देशांमध्ये १६०० किमी लांब सीमा असून उभय देशांमध्ये मोठी सागरी सीमा देखील आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार व परस्पर सहकार्य वाढविण्यास भरपूर वाव आहे. या दृष्टीने आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुंबईला आल्यावर येथील भव्य जवाहरलाल नेहरू बंदराला भेट दिली व व्यापार परिषदेत सहभागी झालो असे राष्ट्राध्यक्षांनी सांगितले.

    म्यानमारमध्ये गेल्यावर्षी झालेल्या भीषण भूकंपानंतर मदत आणि बचावकार्य करण्यासाठी भारताने “ऑपरेशन ब्रह्मा” मोहीम राबवून वैद्यकीय पथके, तात्पुरते हॉस्पिटल, अत्यावश्यक मदतसामग्री तसेच मानवतावादी मदत पाठविल्याचा राष्ट्राध्यक्षांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.

    कोविड काळात देखील भारताने लस, ऑक्सिजन सिलिंडर्स व अन्नसामग्री पुरवल्याबद्दल म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत तसेच येथील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

    भगवान बुद्ध उभय देशांना जोडणारा अध्यात्मिक दुवा : राज्यपाल

    भगवान बुद्ध हे भारत व म्यानमार या देशांना जोडणारा अध्यात्मिक दुवा आहे. विपश्यना पद्धत भारतात नामशेष होत असताना म्यानमारने ती जपून ठेवली व आज विपश्यनेचा लाभ जगाला होत आहे असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी नमूद केले.

    भगवान बुद्धांशी संबंधित विविध स्थळांना जोडणारे भारतातील बुद्धिस्ट सर्किट उभय देशांमधील पर्यटनाला चालना देईल असे राज्यपालांनी सांगितले.

    भारताच्या ‘शेजार प्रथम’ (Neighbourhood First) आणि ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणांमध्ये म्यानमारला विशेष स्थान आहे, असे सांगून म्यानमार हा भारतासाठी आग्नेय आशिया आणि आसियान (ASEAN) देशांकरिता प्रवेशद्वार आहे असे राज्यपालांनी सांगितले. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीमुळे उभय देशांमधील संबंधांना मोठी चालना मिळेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

    बैठकीला म्यानमार राष्ट्रपती कार्यालयाचे केंद्रीय मंत्री खिन माउंग यी, परराष्ट्र व्यवहार मंत्री टिन माउंग स्वे, संरक्षण दलातील लेफ्टनंट जनरल मो म्यिंट स्वे, भारताचे म्यानमारमधील राजदूत तसेच आणि म्यानमारचे भारतातील राजदूत उपस्थित होते.राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे देखील यावेळी उपस्थित होते.

    बैठकीनंतर झालेल्या स्नेहभोजनाला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, भारताचे म्यानमारमधील राजदूत – अभय ठाकूर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती , मरिटाईम एअर ऑपरेशन्सचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर व्हाइस मार्शल प्रशांत वडोदकर उपस्थित होते.
    **

    आर्थिक सहयोग, व्यापार और निवेश बढ़ाने के उद्देश्य से भारत यात्रा : यू मिन आंग ह्लाइंग

    भूकंप तथा कोविड काल में भारत द्वारा दी गई सहायता के लिए जताया आभार

    भगवान बुद्ध दोनों देशों को जोड़ने वाली आध्यात्मिक कड़ी : राज्यपाल

    म्यांमार और भारत, दोनों ही देश कभी उपनिवेश रहे हैं। स्वतंत्रता-पूर्व तथा स्वतंत्रता के बाद भी दोनों देशों के बीच घनिष्ठ संबंध बने रहे हैं। इन संबंधों को नई गति देने के लिए पश्चिम भारत के प्रवेश द्वार मुंबई का दौरा किया है। यह भारत यात्रा आर्थिक सहयोग, व्यापार और निवेश को बढ़ावा देने के उद्देश्य से की जा रही है। यह बात म्यांमार के राष्ट्रपति यू मिन आंग ह्लाइंग ने कही।

    महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने मंगलवार को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ मिलकर लोकभवन में म्यांमार के राष्ट्रपति और उनके प्रतिनिधिमंडल के सम्मान में एक स्वागत समारोह का आयोजन किया था। उससे पूर्व आयोजित बैठक में राष्ट्रपति यू मिन आंग ह्लाइंग बोल रहे थे।

    राष्ट्रपति ने कहा कि भारत और म्यांमार के बीच लगभग 1,600 किलोमीटर लंबी स्थलीय सीमा तथा एक विस्तृत समुद्री सीमा है। दोनों देशों के बीच व्यापार और पारस्परिक सहयोग बढ़ाने की अपार संभावनाएं हैं। इसी उद्देश्य से उन्होंने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात की। मुंबई प्रवास के दौरान उन्होंने जवाहरलाल नेहरू पोर्ट का दौरा किया तथा एक व्यापार सम्मेलन में भी भाग लिया।

    राष्ट्रपति ने पिछले वर्ष म्यांमार में आए विनाशकारी भूकंप के बाद भारत द्वारा चलाए गए “ऑपरेशन ब्रह्मा” का विशेष रूप से उल्लेख किया। उन्होंने कहा कि भारत ने राहत एवं बचाव कार्यों के लिए चिकित्सा दल, अस्थायी अस्पताल, आवश्यक राहत सामग्री तथा मानवीय सहायता भेजकर म्यांमार की मदद की, जिसके लिए उन्होंने भारत के प्रति कृतज्ञता व्यक्त की।

    उन्होंने कोविड-19 महामारी के दौरान भारत द्वारा म्यांमार को उपलब्ध कराई गई वैक्सीन, ऑक्सीजन सिलेंडर और खाद्यान्न सहायता के लिए भी भारत सरकार और भारतीय जनता का आभार व्यक्त किया।

    भगवान बुद्ध दोनों देशों को जोड़ने वाली आध्यात्मिक कड़ी : राज्यपाल

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने कहा कि भगवान बुद्ध भारत और म्यांमार को जोड़ने वाली एक महत्वपूर्ण आध्यात्मिक कड़ी हैं। उन्होंने कहा कि जब भारत में विपश्यना साधना पद्धति लगभग लुप्त हो रही थी, तब म्यांमार ने उसे संरक्षित रखा और आज पूरी दुनिया उस परंपरा का लाभ प्राप्त कर रही है।

    राज्यपाल ने कहा कि भगवान बुद्ध से जुड़े विभिन्न पवित्र स्थलों को जोड़ने वाला भारत का बौद्ध सर्किट दोनों देशों के बीच पर्यटन को बढ़ावा देने में महत्वपूर्ण भूमिका निभाएगा।

    उन्होंने कहा कि भारत की ‘पड़ोसी प्रथम’ (Neighbourhood First) और ‘एक्ट ईस्ट’ (Act East) नीतियों में म्यांमार का विशेष स्थान है। म्यांमार, भारत के लिए दक्षिण-पूर्व एशिया और आसियान (ASEAN) देशों तक पहुंच का प्रवेश द्वार है। राज्यपाल ने विश्वास व्यक्त किया कि म्यांमार के राष्ट्रपति की यह भारत यात्रा दोनों देशों के संबंधों को और अधिक सुदृढ़ बनाएगी।

    बैठक में म्यांमार राष्ट्रपति कार्यालय के केंद्रीय मंत्री खिन माउंग यी, विदेश मंत्री टिन माउंग स्वे, रक्षा बलों के लेफ्टिनेंट जनरल मो म्यिंट स्वे, म्यांमार में भारत के राजदूत, भारत में म्यांमार के राजदूत तथा महाराष्ट्र सरकार के राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित थे।

    बैठक के बाद आयोजित स्नेहभोज में राज्यपाल की पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषद के सभापति प्रो. राम शिंदे, कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पुलिस महानिदेशक सदानंद दाते, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिड़े, म्यांमार में भारत के राजदूत अभय ठाकुर, मुंबई पुलिस आयुक्त देवेन भारती तथा मैरिटाइम एयर ऑपरेशन्स के एयर ऑफिसर कमांडिंग एयर वाइस मार्शल प्रशांत वडोदकर सहित गणमान्य अतिथि उपस्थित थे।