01.05.2026 : महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा
महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा
बाल वारकऱ्यांच्या दिंडीने लोकभवन दुमदुमले
राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पदम पुरस्कार विजेते सन्मानित
बाल वारकऱ्यांनी केलेल्या ‘ज्ञानदेव – तुकाराम’ गजराच्या सुरांनी आज महाराष्ट्र लोकभवन परिसर दुमदुमला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा व त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपालांचे स्वागत बाल वारकऱ्यांच्या दिंडीने व नामगजरात करण्यात आले.
एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांअंतर्गत शुक्रवारी (दि. १ मे) महाराष्ट्र राज्य स्थापनेसह गुजरात राज्य स्थापना दिवस देखील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या मान्यवरांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देश म्हणजे केवळ भागलिक सीमांनी वेढलेले क्षेत्र नसून देश हा विविध संस्कृतींचा सुंदर समूह असतो. एखाद्या राज्याला समजून घ्यायचे असेल तर तेथील संस्कृती समजून घेतली पाहिजे, असे यावेळी बोलताना राज्यपालांनी सांगितले. प्रत्येक राज्याची संस्कृती भिन्न असली तरीही त्यांमध्ये एकात्मतेचा धागा जुळलेला आहे असे त्यांनी नमूद केले.
अमरवाणी फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गायक शंतनू हेर्लेकर, गायिका उपग्ना पंड्या व कलाकार अभिमन्यू हेर्लेकर यांनी सुंदर मराठी व गुजराती लोकगीते व भक्तिगीते सादर केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संतांचे कार्य ही समतेची चळवळ असते असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या पुढाकाराने ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येईल असे राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी यावेळी जाहीर केले.
राज्यपालांच्या हस्ते पद्मभूषण उदय कोटक, उद्योजक पद्मश्री अशोक खडे, कलाकार पद्मश्री भिकल्या धिंडा, पद्मश्री जुझर वसी, कलाकार पद्मश्री आर माधवन, दिवंगत अभिनेते पद्मश्री सतीश शहा, पद्मश्री सत्यनारायण नुवाल आदींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमात ‘सूर निरागस हो’, गुजराती लोकगीत, ‘वैष्णव जन तो’ व तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हा अभंग सादर करण्यात आला. बाल वारकरी मुलांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने उपस्थितांचे मन जिंकले.
राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण व प्रास्ताविक केले, तर राजशिष्टाचार अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सूत्र संचलन व आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला अमरवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ मदन महाराज गोसावी, उद्योजक निखिल मर्चंट, आयुक्त मत्स्य विकास प्रेरणा देशभ्रतार, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे उपस्थित होते.
*****
महाराष्ट्र लोकभवन में महाराष्ट्र एवं गुजरात राज्य स्थापना दिवस का आयोजन
बाल वारकरियों की दिंडी से लोकभवन गूंज उठा
राज्यपाल के हाथों पद्म पुरस्कार विजेताओं का सम्मान
बाल वारकरियों द्वारा किए गए ‘ज्ञानदेव–तुकाराम’ के जयघोष से आज महाराष्ट्र लोकभवन परिसर गूंज उठा। राज्यपाल जिष्णु देव वर्मा तथा उनकी पत्नी सुधा देव वर्मा की उपस्थिति में महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस मनाया गया। इस अवसर पर राज्यपाल का स्वागत बाल वारकरियों की दिंडी और नामस्मरण के साथ किया गया।
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ पहल के अंतर्गत शुक्रवार (1 मई) को महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस के साथ-साथ गुजरात राज्य स्थापना दिवस भी सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से मनाया गया। इस वर्ष पद्म पुरस्कार से सम्मानित विशिष्ट व्यक्तियों का राज्यपाल के हाथों अभिनंदन किया गया।
इस अवसर पर राज्यपाल ने कहा कि देश केवल भौगोलिक सीमाओं से घिरा क्षेत्र नहीं है, बल्कि विविध संस्कृतियों का सुंदर संगम है। किसी राज्य को समझने के लिए उसकी संस्कृति को समझना आवश्यक है। उन्होंने कहा कि प्रत्येक राज्य की संस्कृति भिन्न होने के बावजूद उनमें एकता का सूत्र विद्यमान है।
अमरवाणी फाउंडेशन के सहयोग से आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम में गायक शंतनू हेर्लेकर, गायिका उपग्ना पंड्या तथा कलाकार अभिमन्यू हेर्लेकर ने सुंदर मराठी एवं गुजराती लोकगीत और भक्तिगीत प्रस्तुत किए, जिसकी राज्यपाल ने सराहना की।
राज्यपाल ने कहा कि महाराष्ट्र संतों की भूमि है और संतों का कार्य समाज में समता स्थापित करने का होता है।
इस अवसर पर राज्यपाल की पहल पर ‘टीबी मुक्त भारत’ अभियान की शुरुआत की गई। राज्यपाल के सचिव डॉ प्रशांत नारनवरे ने बताया कि यह अभियान शहरी और ग्रामीण दोनों क्षेत्रों तक पहुंचाया जाएगा।
राज्यपाल के हाथों पद्मभूषण उदय कोटक, उद्यमी पद्मश्री अशोक खाडे, कलाकार पद्मश्री भिखल्या धिंडा, पद्मश्री जुझर वसी, अभिनेता पद्मश्री आर माधवन, दिवंगत अभिनेता पद्मश्री सतीश शहा, तथा पद्मश्री सत्यनारायण नुवाल सहित अन्य गणमान्य व्यक्तियों को सम्मानित किया गया।
सांस्कृतिक कार्यक्रम में ‘सूर निरागस हो’, गुजराती लोकगीत, ‘वैष्णव जन तो’ और ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ जैसे भजनों की प्रस्तुति दी गई। बाल वारकरियों के पारंपरिक नृत्य ने उपस्थित दर्शकों का मन मोह लिया।
कार्यक्रम में राज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरे ने स्वागत भाषण दिया, जबकि राजशिष्टाचार अधिकारी अर्चना गायकवाड ने कार्यक्रम का संचालन एवं आभार प्रदर्शन किया।
इस अवसर पर डॉ मदन महाराज गोसावी , उद्यमी निखिल मर्चंट , मत्स्य विकास आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सह सचिव एस राममूर्ती तथा परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे सहित अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।
