बंद

    विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: October 17, 2018

    राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला विजयादशमी तथा दसर्‍यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा संदेश आपल्याला या सणातून मिळतो. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व संपन्नता घेवून येवो, या शुभेच्छा विजयादशमी निमित्त देत आहे, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.