बंद

    करुणानिधी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: August 7, 2018

    काही काळ तामिळनाडूचे राज्यपाल राहिलेले, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. एम. करुणानिधी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

    करुणानिधी हे तमिळनाडूचे अतिशय लोकप्रिय आणि करिष्मा लाभलेले नेते होते. राजकारणातील भीष्माचार्य असलेल्या करुणानिधी यांचा अखेरपर्यंत देशाच्या राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव होता. ‘कलाईनार’ या नावाने लोकप्रिय असलेल्या करुणानिधी यांना गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत आस्था होती. पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेल्या करुणानिधी यांनी अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या. प्रतिभा संपन्न असलेले करुणानिधी लेखक, पटकथालेखक, साहित्यिक म्हणून देखील लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने तामिळनाडूच्या जनतेने ‘गरीबांचा मसीहा गमावला आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी तामिळनाडूच्या जनतेला आणि त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवीत आहे, असे विद्यासागर राव यांनी द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.